शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

गणेश चतुर्थीला दिला कंत्राटी कर्मचा-यांना नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:13 IST

हिवराआश्रम : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानामध्ये राज्यात कृषी विभागातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या अल्प मानधनावरील कंत्राटी कर्मचारी क्षेत्र सल्लागार यांच्या सेवा  निधी उपलब्ध नसल्यामुळे २५ आॅगस्ट २०१७ पासून खंडीत करण्याचा निर्णय झाल्याने संबंधित कर्मचाºयांना धक्का बसला असून कुटूंबाची जबाबदारी असल्याने क्षेत्र सल्लागारावर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.

ठळक मुद्देराफअच्या क्षेत्र सल्लागारांची सेवा खंडीत

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानामध्ये राज्यात कृषी विभागातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या अल्प मानधनावरील कंत्राटी कर्मचारी क्षेत्र सल्लागार यांच्या सेवा  निधी उपलब्ध नसल्यामुळे २५ आॅगस्ट २०१७ पासून खंडीत करण्याचा निर्णय झाल्याने संबंधित कर्मचाºयांना धक्का बसला असून कुटूंबाची जबाबदारी असल्याने क्षेत्र सल्लागारावर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत २००५-०६ पासून राज्यात मंडळ, जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत काम करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून क्षेत्र सल्लागार यांची भरती करण्यात आली होती. सदर अभियान हे कृषि विभागाची महत्वकांक्षी योजना असून सदर योजनेअंतर्गत सामुहीक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, हरीतगृह, शेडनेट हाऊस, पॅक हाऊस, कांदा चाळ उभारणी, प्राथमिक फळप्रक्रिया केंद्र, फलोत्पादन यांत्रीकीकरण, क्षेत्र विस्तार, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी बाबीची कामे क्षेत्र सल्लागार करीत होते. सदर योजनेमुळे राज्याच्या बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सदर योजनेमुळे शेतकºयांना स्थैर्य प्राप्त झाले आहे. तसेच संरक्षित शेती अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेडनेट हाऊस व हरीतगृह यांची उभारणी केल्यामुळे शेतकºयांना कमी पाण्यामध्ये व संरक्षित वातावरणामध्ये जास्त उत्पादन होत आहे. या सर्व कामासाठी क्षेत्र सल्लागार यांचे मार्गदर्शन व मदत शेतकºयांना होत असे. सदर क्षेत्र सल्लागाराची नियुक्ती ही २००५-०६ पासून करण्यात आली आहे. मात्र अचानक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक यांनी पुण्याच्या सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन प्रा.लि.बाणेर या कंपनीला पत्राद्वारे कळविले की, मंडळाकडे व्यवस्थापन खर्चासाठी कमी निधी उपलब्ध असल्याने तालुका स्तरावरील कंत्राटी पद्धतीने कार्यरत क्षेत्र सल्लागारांची पदे कमी करुन २५ आॅगस्ट २०१७ पासून त्यांची सेवा खंडीत करावी. यामुळे कंत्राटी कर्मचारी यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

मुदतीपूर्वीची केली सेवा खंडीतसन २०१६-१७ करीता सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन प्रा.लि.पुणे या संस्थेकडून आठ नोव्हेंबर २०१६ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने क्षेत्र सल्लागार भरण्यात आले होते. या पदाचा कालावधी शिल्लक असतानाही या प्रकारची कार्यवाही आश्चर्यकारक आहे.

कृषी विभागात सामावून घेण्याची कंत्राटी कर्मचाºयांची मागणीशेतकºयांना सक्षम करण्यासाठी एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामुहीक शेततळे, कांदाचाळ, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, फलोत्पादन यांत्रीकीकरण, क्षेत्र विस्तार, पॅक हाऊस या बाबी राबविल्या गेल्या आहेत. यासाठी तालुका स्तरावर क्षेत्र सल्लागार यांची प्रमुख भुमीका होती. या कामाचा प्रदिर्घ अनुभव असल्याने या कंत्राटी कर्मचाºयांना कृषी विभागात समावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचारी करीत आहेत.