शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रसवंती चालकांना आर्थिक पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST

रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या ...

रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या उसाला रसवंतीशिवाय पर्याय नाही. गत वर्षी लॉकडाऊनमुळे चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील लागवड केलेला ऊस तसाच वाळून गेला. यावर्षी सुद्धा संचारबंदी केल्याने रसवंती चालकांचा व्यवसाय ठप्प पडल्याने प्रामुख्याने रसवंतीसाठी लागवड केलेला ऊस तसाच पडून राहणार आहे. शिवाय सद्य:स्थितीत जिल्ह्यातील शेतकरी स्वत:च्या रसवंतीसाठीच उसाची लागवड करतात, त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बहुतांश रसवंती गावाबाहेर आहेत. गावात किंवा शहरात असणाऱ्या दुकानात फार मोठी गर्दी होते, असे कुठेही चित्र कोणत्याही रसवंतीमध्ये कधी पाहायला मिळाले नाही. रसवंती चालकांनी प्रत्येक ग्राहकांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. राज्य महामार्ग किंवा इतर रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने ही तर प्रवाशांच्याच भरवशावर चालतात. त्यामुळे संचारबंदी किंवा लॉकडाऊन काळात रसवंती चालक यांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी व रसवंती चालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे. ग्राहकांअभावी पडून असलेला ऊस साखर कारखान्याला देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे. त्यानुषंगाने चिखली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व रसवंती चालक शेतकऱ्यांनी देखील आ. श्वेता महाले यांची भेट घेऊन त्यांना रसवंतीसाठी परवानगी, आर्थिक पॅकेज व ग्राहकांअभावी पडून राहणाऱ्या उसाची व्यवस्था लावण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी अ‍ॅड. सुनील देशमुख, अ‍ॅड. दिलीप यंगड, विकास जाधव, आदींसह रसवंती चालक उपस्थित होते.