शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:18 IST

सभापती सत्येंद्र भुसारी यांची मागणी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन

चिखली : सध्या महाराष्ट्रभर नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची तूर गेल्या दोन महिन्यांपासून नाफेडच्या केंद्रावर वजन मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे. अशा प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे नाफेडला म्हणजेच शासनाला शक्य नसल्यास, त्या शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव व बाजारभाव यातील फरक साधारणत: १ हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सध्या बाजारात तुरीला सरासरी ४ हजार रुपये भाव देण्यात येत आहे. हमीभावानुसार ही तफावत १ हजार रुपयांची असल्याने ती तफावत जर शेतकऱ्यांना शासनाने दिली तर सर्व प्रश्न मिटू शकेल. शिवाय नाफेडवरील गैरसोय व गैरप्रकारही टाळले जातील. तर नाफेडने आता खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर नाइलाजाने खुल्या बाजारात विकावी लागणार व त्यांना प्रति क्विंटल १ हजार ते १२०० पर्यंत नुकसान सोसावे लागणार असल्याने या मागणीचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करण्याचे नाफेडने ठरविले, तरी खरेदी करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, तर चुकारा मिळण्यासाठी त्यापुढील चाळीस ते पन्नास दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांकडे पैसेच राहणार नाहीत, तसेच पेरणीपूर्वी कर्ज भरणा करायचा कसा, मुलांचा शैक्षणिक खर्च असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत, तर सद्यस्थितीत खरेदी केंद्रावर उघड्यावर टाकलेली तूर प्रखर उन्हामुळे जीर्ण होत आहे. त्यातच पुढच्या महिन्यात अवकाळी पावसाचाही धोका आहे. त्यामुळे या सर्व बाबीवर तोडगा म्हणून खरेदी केंद्रावर आणलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक दिल्यास प्रक्रिया खर्च व कालावधीची बचत होऊन शेतकऱ्यांची होणारी परवड थांबण्यास मदत होईल व शासनावरसुद्धा कमी भार पडेल, त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मागणी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.