शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:18 IST

सभापती सत्येंद्र भुसारी यांची मागणी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन

चिखली : सध्या महाराष्ट्रभर नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची तूर गेल्या दोन महिन्यांपासून नाफेडच्या केंद्रावर वजन मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे. अशा प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे नाफेडला म्हणजेच शासनाला शक्य नसल्यास, त्या शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव व बाजारभाव यातील फरक साधारणत: १ हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सध्या बाजारात तुरीला सरासरी ४ हजार रुपये भाव देण्यात येत आहे. हमीभावानुसार ही तफावत १ हजार रुपयांची असल्याने ती तफावत जर शेतकऱ्यांना शासनाने दिली तर सर्व प्रश्न मिटू शकेल. शिवाय नाफेडवरील गैरसोय व गैरप्रकारही टाळले जातील. तर नाफेडने आता खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर नाइलाजाने खुल्या बाजारात विकावी लागणार व त्यांना प्रति क्विंटल १ हजार ते १२०० पर्यंत नुकसान सोसावे लागणार असल्याने या मागणीचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करण्याचे नाफेडने ठरविले, तरी खरेदी करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, तर चुकारा मिळण्यासाठी त्यापुढील चाळीस ते पन्नास दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांकडे पैसेच राहणार नाहीत, तसेच पेरणीपूर्वी कर्ज भरणा करायचा कसा, मुलांचा शैक्षणिक खर्च असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत, तर सद्यस्थितीत खरेदी केंद्रावर उघड्यावर टाकलेली तूर प्रखर उन्हामुळे जीर्ण होत आहे. त्यातच पुढच्या महिन्यात अवकाळी पावसाचाही धोका आहे. त्यामुळे या सर्व बाबीवर तोडगा म्हणून खरेदी केंद्रावर आणलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक दिल्यास प्रक्रिया खर्च व कालावधीची बचत होऊन शेतकऱ्यांची होणारी परवड थांबण्यास मदत होईल व शासनावरसुद्धा कमी भार पडेल, त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मागणी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.