शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:19 IST

ममदापूर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसात हरणाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.

ठळक मुद्देममदापूर : आठ दिवसात तिसरी घटना

ममदापूर : ममदापूर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसात हरणाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.ममदापूर येथील विजय सीताराम साबळे यांच्या मालकीच्या शेतात गावातील शिकारी कुत्र्यांनी दीड ते दोन वर्षे वयाच्या हरणाची शिकार केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही कुत्रे एकमेकांत लढताना विजय साबळे यांनी बघितले व त्या दिशेने जाऊन बघितले असता त्यांना हरीण घायाळ होऊन पडलेले दिसून आले. त्यांनी कुत्र्यांना लांब हुसकावून हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडले आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले.परंतु हरणच्या मानेवर कुत्र्यांनी जबर चावा घेतल्याने हरणाने अगोदरच प्राण सोडला होता. साबळे यांनी सदरची माहिती वनविभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय भंडारी यांना दिली. त्यांनी लगेचच वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, शेषराव सोनवणे यांना घटनास्थळी पाठवले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले तेव्हा हरीण मृत झाले होते. नंतर या हरिणीचे दफन करण्यात आले. आठ दिवसातील ममदापूर परिसरातील ही तिसरी घटना आहे. राजापूर येथे एक हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता तर खरवंडी येथे विहिरीत पडलेल्या हरिणाला वनविभागाकडून सुखरूप विहिरीच्या वर काढून जीवदान मिळाले तर तिसरी कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू पडल्याने वन्य प्राणी प्रेमी मध्ये नाराजीचा सूरआहे. यावर्षी ममदापूर राजापूर खरवंडी देवदरी या भागात भयानक दुष्काळ असल्याने हरीण अन्न व पाण्याच्या शोधात या भागातून काही प्रमाणात स्थलांतर करत आहेत. त्यातच गावाच्या दिशेने आलेल्या हरणांचा विहिरीत पडून कधी रस्ता ओलांडताना तर कधी कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव