शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरईजीएस'ची कामे तातडीने सुरू करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

चिखली : चिखली मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यांतील ‘एमआरईजीएस’च्या कामांचा सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार असतानाही अद्याप कामांना ...

चिखली : चिखली मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यांतील ‘एमआरईजीएस’च्या कामांचा सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार असतानाही अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. तथापि, कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामाला मागणी असूनही मान्यता देण्यात आलेली नाही. एकूण जिल्ह्यात हीच स्थिती असल्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करण्याबाबत आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.

चिखली तालुक्यातील दिवठाणा, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहांगीर, मंगरूळ नवघरे, भोरसा-भोरसी, करतवाडी, एनखेड, कोलारा, रानअंत्री, आमखेड आदी ठिकाणच्या मजुरांनी कामांची मागणी केलेली असून रस्त्यांच्या कामांचा प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला आहे; परंतु अद्यापपर्यंत या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. तसेच चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी रस्ते, विहीर, गोठे, सिंचनाची कामे आदींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही कामे कृती आराखड्यात देखील समाविष्ट आहेत. तरीसुद्धा कोणत्याही कामाना मान्यता न मिळाल्याने किंवा सुरू न झाल्याने रोष व्यक्त होत आहे. गत ५ ते ६ वर्षांपासून मान्यताच न देण्यात आल्याने प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीसोबत त्यांना स्थलांतर करावे लागत आहे, असे स्पष्ट करताना या कामांसदर्भात प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्याभरातील लोकउपयोगी कामे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत असून ‘एमआरईजीएस’चा कोणताही प्राप्त निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात खर्च होत नाही, अशा शब्दात आ. श्वेता महालेंनी नाराजी व्यक्त केली असून पावसाळा तोंडावर आल्याने तातडीने कामांना मान्याता देऊन ती पूर्णत्वास न्यावीत, असे स्पष्ट केले आहे.

कालबद्ध कार्यक्रम आखावा !

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीमध्ये आणि लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. तसेच शेतीचा हंगाम संपल्यामुळे शेतमजुरांनासुद्धा कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. तसेच लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने आणि कोविडमुळे शासनाने निधी कपात केल्याने शासकीय बांधकामे ठप्प पडल्याने बांधकाम मजूरसुद्धा मोठ्या प्रमाणात घरी बसून आहेत. त्यामुळे कृती आराखड्यातील मंजूर कामे तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांना कालबद्ध कार्यक्रम आखून कामे करण्याचे निर्देश देण्याची मागणी आ. महाले यांनी केली आहे.