शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘अर्ज घ्या - कर्ज द्या’ आंदोलन

By admin | Updated: September 4, 2015 00:27 IST

खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा.

खामगाव : सलग तिसर्‍या वर्षी भयंकर दुष्काळ व नापिकीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना एकत्र करुन त्यांचे मनोधैर्य वाढावे व शासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर ह्यअर्ज द्या - कर्ज घ्याह्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. नापिकीमुळे शेतकर्‍यांवर कर्ज थकीत झाले आहे. त्यातच यावर्षी शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुटुंबीयांच्या आजारावर उपचार, मुलांचे शिक्षण यावर खर्च कोठून करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांच्या सह्या घेऊन मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता वाशिम जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मासूमशहा मस्तानशहा, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शाम अवथळे, प्रकाश पाटील, आर.,बी.देशमुख, गजानन पटोकार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी संजय सातव, ज्ञानदेव कराळे, शे.युनुस शे.युसुफ, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, आनंदा आटोळे, रणजीत देशमुख, संजय सातव, शे.कलंदर खान, अनिल चव्हाण, सोपान खंडारे या व इतर शेतकर्‍यांचा सहभाग होता. यावेळी तहसील कार्यालय परिसरात शेतकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली.