शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘अर्ज घ्या - कर्ज द्या’ आंदोलन

By admin | Updated: September 4, 2015 00:27 IST

खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा.

खामगाव : सलग तिसर्‍या वर्षी भयंकर दुष्काळ व नापिकीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना एकत्र करुन त्यांचे मनोधैर्य वाढावे व शासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर ह्यअर्ज द्या - कर्ज घ्याह्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. नापिकीमुळे शेतकर्‍यांवर कर्ज थकीत झाले आहे. त्यातच यावर्षी शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुटुंबीयांच्या आजारावर उपचार, मुलांचे शिक्षण यावर खर्च कोठून करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांच्या सह्या घेऊन मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता वाशिम जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मासूमशहा मस्तानशहा, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शाम अवथळे, प्रकाश पाटील, आर.,बी.देशमुख, गजानन पटोकार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी संजय सातव, ज्ञानदेव कराळे, शे.युनुस शे.युसुफ, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, आनंदा आटोळे, रणजीत देशमुख, संजय सातव, शे.कलंदर खान, अनिल चव्हाण, सोपान खंडारे या व इतर शेतकर्‍यांचा सहभाग होता. यावेळी तहसील कार्यालय परिसरात शेतकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली.