शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची विल्हेवाट नळगंगेत!

By admin | Updated: May 16, 2017 01:04 IST

मलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे नळगंगा मायीच्या पात्राचे अक्षरश: डंम्पींग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे नदी काठच्या हजारो नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासन नदी खोलीकरणासाठी लाखो रूपये खर्च करत असताना इथे मात्र घाणीमुळे नदी भरणाचा कार्यक्रम सुरू असून प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी पावसाळ्यापुर्वीची तयारी म्हणून पालिका अखत्यारीत नाल्यांची साफसफाई सुरू आहे. त्यातल्या त्यात शहरात खाजगी बांधकामांची भाऊगर्दी वाढलीय हयात निघणारा केरकचरा व मलबा शेकडो टन स्वरूपात असून त्याची विल्हेवाट नगर पालिकेच्या अधिकृत ‘डंम्पींग’ ग्राऊंडमध्ये न होता नळगंगा नदीच्या पात्रात लावली जात आहे.मलकापूर शहरातून नळगंगा मायीची वाटचाल पुढे पुर्णामायीच्या पात्राकडे झालेली आहे. त्याच नळगंगा पात्राचे, काशीपुरा, सालीपुरा, बारादरी, किल्लावार्ड, मोहनपुरा, पारपेठ अशा नदीलगतच्या परिसरात अक्षरश: डम्पींग ग्राऊंड झाल्याचे विदारक चित्र आहे. त्यातल्या वैकुंठधाम स्मशानभुमी परिसरात त्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची अक्षरशा ‘हाईट’ झाल्याचे दिसते. नळगंगा मायीचे पात्र घाण व केरकचरा तथा मलब्यानंतर दिवसेंदिवस भरत चालल्याने मलकापुरात रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे. साथीच्या रोगांना त्यात खुलेआम निमंत्रण दिल्या जात असून नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरीकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन मुग गिळून असल्याचे दिसते. एकीकडे नदी खोली करणासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी लाखो रूपये खर्च केल्या जातात इथे मात्र शहरातील घाण, केरकचरा व बांधकामांचा मलबा आदिंनी नदीपात्र भरण्याचा कार्यक्रम दिवसाढवळ्या सुरू आहे. पालिका प्रशासनाने त्याविषयी कानावर हात ठेवले आहे. प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रात घाण करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरूध्द कोण कारवाई करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. आपल्याला काय बिलं निघाली की झालं!नळगंगा नदी असो किंवा दुसरं काही आपण बघत राहायचं. शहरातला कचरा, घाण किंवा बांधकामाचा मलबा टाकून एकदा का नदीपात्र भरले की मग खोलीकरणाच्या नावाखाली त्याची बिल काढायची... कामं होवो अथवा ना होवो आपल्याला काय बिल निघालं की झालं असा पालिका अखत्यारीत काम करणाऱ्या काही ठेकेदारांचा खाक्याच बनला आहे.शहरातली घाण व कचरा नदीपात्रात टाकण्याविषयी आमचे कसलेच आदेश किंवा सूचना नाहीत. तसं होत असेल तर ती चुकीची बाब आहे. नागरीकांनी तसे करणाऱ्यांची माहिती द्यावी. त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई प्रशासनाच्यावतीने करण्यात येईल.- श्रीनिवास कुरे,मुख्याधिकारी न.प. मलकापूर