शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

अमडापूर गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

अमडापूर: अमडापूर गावासाठी १ कोटी २२ लक्ष रुपयांची नळयोजना कव्हळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र धरणात मुबलक साठा असतानाही नागरिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात असतानाही पाणी पट्टीचे बिल ३0 दिवसांचे वसूल केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी अतिशय अशुद्ध आणि गढूळ आहे. पिण्यायोग्य पाणी दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सणासुदीच्या दिवसात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विहिरींमध्ये आता पावसाळा सुरू असल्याने ब्लिचिंग पावडर नियमित टाकल्यास विहिरीतील पाणी शुद्ध राहून आरोग्यास येत असलेला धोका टळू शकतो. याकरि ता ग्रा.पं.तीने लक्ष देण्याची गरज असून, राजकारणाकडे थोडे लक्ष कमी करून गावकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, अशी गावकर्‍यांची रास्त मागणी आहे.आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावामध्ये ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ सुरू असून, गावातील नाल्या, रस्त्यावर खड्डय़ामध्ये थांबलेले पावसाचे पाणी व होत असलेल्या घाणीवर ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी. तसेच आता गणपतीचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ावर उपाययोजना करावी. गणपती मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडीअडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.