शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

फळांच्या राजाला नववर्षाच्या महूर्तावर विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:23 IST

बुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  

ठळक मुद्देआंब्यासाठी १.४७ लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई  नुकसान झाल्यास शेतकºयांना १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  फळांचा राजा असलेला आंबा आता शेताच्या बांधावर कमी प्रमाणात दिसत आहे. बांधावरील आंब्याचे प्रमाण कमी झाल्याने वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या फळबागा घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. या आंब्याच्या फळबागांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०१७-१८ लागू करण्यात आली आहे. कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सदर विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंबा या फळ पिकासाठी १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण राहणार आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१८ या कालावधीत अवेळी पावसाने नुकसान झाल्यास ३० हजार रुपये नुकसान भरापाई देय राहणार आहे. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जास्त तापमानामुळे नुकसान झाल्यास २७ हजार ५०० रुपये, १ एप्रिल ते ३१ मे २०१८ या कालावधीत नुकसान झाल्यास १६ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देय राहणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान कमी तापमानामुळे नुकसान झाल्यास ३३ हजार रुपये व १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत गारपीटमुळे नुकसान झाल्यास ३६ हजार ७०० रुपये विमा संरक्षीत रक्कम देण्यात येईल. अशाप्रकारे एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये देय राहणार आहे. 

प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतबँकेकडून अधिसुचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या व बिगर कर्जदार शेतकºयांचा आंबा या फळ पिकाचा विमा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच आंबा या फळ पिकासाठी बँकानी कर्जदार शेतकºयांची घोषणा पत्र संबंधीत विमा कंपनीस १८ जानेवारी पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

आंबा फळासाठी तीन तालुकेच समाविष्टफळांचा राजा असलेल्या आंबा या महत्वाच्या फळ पीकाला विमा देण्यासाठी पश्चिम वºहाडातील केवळ तीन तालुक्यांचाच समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मध्ये आंबिया बहाराकरीता पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता अधिसूचित जिल्ह्यांमध्ये पश्चिम वºहाडातून  बुलडाणा व वाशिम हे दोन जिल्हे आंबा या फळ पीकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. तर वाशिम जिल्ह्यातून वशिम तालुक्यातील केकत उमरा व राजगाव आणि मानोरा तालुक्यातील मानोरा हे महसूल मंडळ समाविष्ट आहे.