शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

फळांच्या राजाला नववर्षाच्या महूर्तावर विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:23 IST

बुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  

ठळक मुद्देआंब्यासाठी १.४७ लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई  नुकसान झाल्यास शेतकºयांना १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे.  फळांचा राजा असलेला आंबा आता शेताच्या बांधावर कमी प्रमाणात दिसत आहे. बांधावरील आंब्याचे प्रमाण कमी झाल्याने वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या फळबागा घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. या आंब्याच्या फळबागांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०१७-१८ लागू करण्यात आली आहे. कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सदर विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंबा या फळ पिकासाठी १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण राहणार आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१८ या कालावधीत अवेळी पावसाने नुकसान झाल्यास ३० हजार रुपये नुकसान भरापाई देय राहणार आहे. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जास्त तापमानामुळे नुकसान झाल्यास २७ हजार ५०० रुपये, १ एप्रिल ते ३१ मे २०१८ या कालावधीत नुकसान झाल्यास १६ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देय राहणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान कमी तापमानामुळे नुकसान झाल्यास ३३ हजार रुपये व १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत गारपीटमुळे नुकसान झाल्यास ३६ हजार ७०० रुपये विमा संरक्षीत रक्कम देण्यात येईल. अशाप्रकारे एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये देय राहणार आहे. 

प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतबँकेकडून अधिसुचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या व बिगर कर्जदार शेतकºयांचा आंबा या फळ पिकाचा विमा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच आंबा या फळ पिकासाठी बँकानी कर्जदार शेतकºयांची घोषणा पत्र संबंधीत विमा कंपनीस १८ जानेवारी पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

आंबा फळासाठी तीन तालुकेच समाविष्टफळांचा राजा असलेल्या आंबा या महत्वाच्या फळ पीकाला विमा देण्यासाठी पश्चिम वºहाडातील केवळ तीन तालुक्यांचाच समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मध्ये आंबिया बहाराकरीता पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता अधिसूचित जिल्ह्यांमध्ये पश्चिम वºहाडातून  बुलडाणा व वाशिम हे दोन जिल्हे आंबा या फळ पीकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. तर वाशिम जिल्ह्यातून वशिम तालुक्यातील केकत उमरा व राजगाव आणि मानोरा तालुक्यातील मानोरा हे महसूल मंडळ समाविष्ट आहे.