शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

संतप्त शेतक-यांचा मोर्चा

By admin | Updated: September 28, 2014 23:15 IST

अमडापूर येथील शेतक-यांची सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी.

अमडापूर ( बुलडाणा): यावर्षी मोठय़ा नैसर्गिक संकटातून जगविलेले पिक वाचविण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकर्‍यांनी आज २८ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागले. तर यातून वाचविलेल्या पिकांना आता पावसाने उघाड दिल्याने सोयाबिन-तूर-कपाशी ही िपके सुकत आहेत. विहिरी, तसेच नदी नाल्यांमध्ये पाणी सुध्दा उपलब्ध आहे. मात्र गेल्या चार दिवसां पासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत आहे. अखेर याला कंटाळून आज येथील शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता चिखली यांना निवेदन दिले. यावर उपकार्यकारी अभियंता यांनी पावर ग्रीडमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आहे. यामुळे परिक्षण उपकेंद्राकडून कृषी वाहिनीवर तातडीने अतिरीक्त भारनियमन करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. त्या कारणाने सर्व कृषी वाहिनीवर तातडीचे भारनियमन करण्यात येत असल्याचे लेखी शेतकर्‍यांना दिले.