शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

वीजपुरवठा वारंवार खंडित, पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

साखरखेर्डा : गत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाणीपुरवठा करणारे पंप जळाले आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून ...

साखरखेर्डा : गत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाणीपुरवठा करणारे पंप जळाले आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. सतत खंडित होणाऱ्या विजेमुळे पंप जळाल्याचा आरोप सरपंच यांनी केला आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

साखरखेर्डा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महालक्ष्मी तलावाजवळ पाणीपुरवठा विहीर असून, या विहिरीतून दोन जलकुंभात पाणी साठविले जाते. त्यानंतर वॉर्डनिहाय पाणीपुरवठा केल्या जातो. महालक्ष्मी तलावाजवळील विहिरीवरील पाणीपुरवठा पंप निकामी झाल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या वर्षभरापासून साखरखेर्डा गावात अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने कनिष्ठ अभियंता कुनाल डोळे यांना वेळोवेळी निवेदन दिले. परंतु वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यानंतर उपअभियंता खान यांनाही निवेदन दिले. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे १ लाख ५० हजारांचा पंप निकामी झाला आहे. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर साखरखेर्डा वीज वितरण उपकार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती

ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा १५ दिवसांपासून ठप्प असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देउन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी विनंती केली आहे. जर सुधारणा झाली नाही तर पुढचे पाऊल टाकण्यात येईल.

दाऊत कुरेशी , सरपंच, साखरखेर्डा