शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा सुरूच!

By admin | Updated: May 24, 2017 00:28 IST

बुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता महिलांनी लढा द्यायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता महिलांनी लढा द्यायला सुरुवात केली आहे. दररोज जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये महिला दारूबंदीसाठी एल्गार पुकारत असून, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयात निवेदन देत आहेत. न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंच आणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारित करू शकतात, याकरिता सर्वांनी दक्ष राहून १ मे रोजी ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव पारित करून घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागून असलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्यामुळे मद्य विक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला. मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानाच्या वतीने अनेक ठिकाणी सभाही पार पडल्या. विविध ठिकाणी झालेल्या सभेत आता जिल्ह्यात बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजे संपूर्ण परिवाराची जिवंतपणीच आत्महत्या होय, असा सूर यावेळी सभेला उपस्थित मान्यवर सतीशचंद्र रोठे, कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील, सोपान बिचारे, सुरेखा निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला. बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदीप काकडे, शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे, शाहीर इंगळे गुरुजी, पद्मा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे, उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशीला, गोकुळाबाई भातोकार, शीला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रवी भोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा, सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी. रूपने, नलिनी उन्हाळे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले. दारूमुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.