शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा सुरूच!

By admin | Updated: May 24, 2017 00:28 IST

बुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता महिलांनी लढा द्यायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता महिलांनी लढा द्यायला सुरुवात केली आहे. दररोज जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये महिला दारूबंदीसाठी एल्गार पुकारत असून, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयात निवेदन देत आहेत. न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंच आणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारित करू शकतात, याकरिता सर्वांनी दक्ष राहून १ मे रोजी ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव पारित करून घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागून असलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्यामुळे मद्य विक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला. मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानाच्या वतीने अनेक ठिकाणी सभाही पार पडल्या. विविध ठिकाणी झालेल्या सभेत आता जिल्ह्यात बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजे संपूर्ण परिवाराची जिवंतपणीच आत्महत्या होय, असा सूर यावेळी सभेला उपस्थित मान्यवर सतीशचंद्र रोठे, कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील, सोपान बिचारे, सुरेखा निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला. बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदीप काकडे, शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे, शाहीर इंगळे गुरुजी, पद्मा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे, उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशीला, गोकुळाबाई भातोकार, शीला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रवी भोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा, सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी. रूपने, नलिनी उन्हाळे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले. दारूमुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.