शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मोफत बियाण्यांचा लाभ केवळ २00 शेतक-यांना !

By admin | Updated: August 2, 2016 01:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात मोफत बियाणे योजनेअंतर्गत ११ हजार ६२५ बियाण्यांच्या पाकिटापैकी केवळ ४३0 पाकिटांचे वाटप.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून मोफत कापूस बियाणे देण्याच्या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकर्‍यांना वितरित करण्यासाठी आलेल्या ११ हजार ६२५ बियाण्यांच्या पाकिटापैकी केवळ २१५ शेतकर्‍यांना ४३0 पाकिटांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. मात्र शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटप करण्यासाठी उशिरा काढण्यात आलेल्या परिपत्रकाचा फटका शेतकर्‍यांच्या वाटप प्रक्रियेला बसला आहे. सन २0१२-१३ व २0१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या व सध्या थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी पीक कर्ज मिळणार नाही. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासनाने बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने मोफत बियाणे वाटपाची योजना आखली. इंडियन र्मचंट्स चेंबर मुंबई (आयएमसी) या संस्थेमध्ये आणि शासनामध्ये २३ जून १६ रोजी सामंजस्य करार झाला. त्यानुसार राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना कापूस व सोयाबीन बियाणे मोफत वाटपाचे नियोजन करण्यात आले; परंतु बियाणे वाटपाची प्रक्रिया, पुरवठादार कंपन्यांना दिल्या जाणारे देयके याबाबींचा समावेश करुन मोफत कापूस बियाणे पुरविण्याचे परिपत्रक ५ जुलै रोजी काढण्यात आले. शासनाने परिपत्रक काढल्यानंतर जिल्ह्यातील कृषी अधिकार्‍यांनी कापूस पेरणीचा आढावा घेतला असता बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा बुलडाणा जिल्ह्यामध्ये फारसा उपयोग झाला नाही. देऊळगाव राजा आणि मेहकर या तालुक्यातून तर कपाशीच्या बियाण्याची मागणीच आली नाही. बुलडाणा आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांसाठी केवळ ११२५ कपाशी बियाण्यांच्या पाकिटांचे नियोजन करण्यात आले. मात्र एकाही शेतकर्‍याने या योजनेचा लाभ घेतला नाही. चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि लोणार या सात तालुक्यांसाठी आलेली बियाण्यांची सात हजार पाकिटे परत करण्यात येत आहेत. शेगाव तालुक्यात ३0, तर नांदुरा तालुक्यात ४00 पाकिटांचे वाटप शेतकर्‍यांना करण्यात आले आहे. एकंदरित ११ हजारांवर बियाण्यांचे पाकिटे आता कृषी विभागामार्फत संबंधित कंपनीला परत करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देणारी ही योजना जिल्ह्यात सपशेल अपयशी ठरली आहे.