शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सुकडी बनली जनावरांचे खाद्य!

By admin | Updated: July 12, 2017 00:59 IST

अंगणवाडीत : पोषण आहारातील सुकडीकडे बालकांची पाठ!

मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंगणवाडी केंद्रामार्फत बालकांना वितरित होणारी सुकडी बालकांऐवजी जनावरांच्या पोटात जाऊ लागली आहे. संपूर्ण मलकापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात ही सुकडी जनावरांचा चारा बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. मलकापूर तालुक्यात सुमारे १४० अंगणवाडी केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत ० ते ३ वर्षे वयोगटातील ३ हजार ५४४ तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील ३ हजार १४५ अशा प्रकारे एकूण ६ हजार ६८९ लाभार्थी बालके असून, या बालकांना सुकडी, उपमा, सत्तू, खिचडी, मॅगीचे पाकीट, शिरा, चवळी व मटकी यासारखा पोषण आहार दिला जातो. या आहारापैकी वितरित होणारी सुकडी ही बालकांना खावीशी वाटत नसल्याने ती सुकडी जनावरांना दिली जाते. याबाबत सोमवार, १० जुलै रोजी ‘लोकमत’ने तालुक्यातील काही गावांमध्ये चौकशी केली तर काही गावांत जाऊन पाहणी केली असता सत्यता समोर आली.सुकडीबाबत पालकांमध्ये गैरसमज!सुकडीची पॅकिंग कधीची असेल, ती सेवन केल्याने आपल्या मुला-मुलींना काही त्रास तर नाही ना उद्भवणार, बालके जर खातच नाही तर त्याबाबत त्यांना घरात कुणी आग्रह तरी का करावा, असे प्रश्नार्थक वातावरण या पाहणी व चौकशीदरम्यान दिसून आले. बालकांना मिळणारी सुकडी ही वाया गेल्यापेक्षा जनावरांच्या पोटात गेलेली बरी! या मानसिकतेतून ही सुकडी ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांच्या घरी पशू पाळलेली आहेत. त्यांचा चारा बनत आहे. बालकांऐवजी ही सुकडी गुरांना खाऊ घातल्या जात आहे. काही ठिकाणी मोबदला; कुठे मोफत वितरण!घरातील सुकडी गोठ्यात गुरांपुढे टोपलीत मांडल्या जात आहे. अनेक ठिकाणी तर गुरे मालक ही सुकडी गावातून बालकांच्या घरून विनामोबदला अथवा मोबदला देऊन प्राप्त करतात. काही पालक तर स्वत: बालकांच्या हातून ही सुकडी गुरे मालकांकडे पोहोचवतात. असे वास्तव सुकडी या पोषण आहाराबाबत समोर आले आहे.सुकडी जनावरांचा चारा झाल्याचे कुठेही निदर्शनास नाही. तथापि, नजरेआड कुणी जनावरांना टाकत असल्यास आपणास याबाबत काहीही माहिती नाही. यासंदर्भात कोठेही तक्रारदेखील प्राप्त नाही.- एस.टी. चव्हाण,बालविकास प्रकल्प अधिकारी, प.स. मलकापूर.