शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

चारा दुपटीने महागला!

By admin | Updated: November 23, 2015 01:16 IST

अवर्षणाचा फटका आता गुरांनाही बसत असून, हिवाळ्याच्या प्रारंभीच चा-याचे दुपटीने भाव वाढले.

अनिल गवई/खामगाव : अवर्षणाचा फटका आता गुरांनाही बसत असून, चार्‍याचे हिवाळ्याच्या प्रारंभीच दुपटीने भाव वाढले आहेत. ग्रामीण भागात दहा ते बारा रुपयांत मिळणारी चार्‍याची एक पेंडी २५-३0 रुपयांना मिळत असून, गुरांच्या संगोपनाचा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या खामगाव परिसरातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाले आहेत. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात आला. अत्यल्प चार्‍यामुळे जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ६८८ दुभत्या जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन हिवाळ्याच्या प्रारंभालाच खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चाराटंचाई जाणवत असल्यामुळे शासनाने वैरण विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. चारा आणि वैरण विकास कार्यक्रमासाठी शासनाने जिल्ह्यासाठी २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र या कार्यक्रमाची संभाव्य यश पाहता, उन्हाळ्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच चार्‍याची साठवणूक चालविली आहे. त्यामुळे बाजारात चारा उपलब्ध होत नसल्याने गेल्या वर्षी १0-१२ रुपयांना सहज उपलब्ध होत असलेल्या चार्‍याची पेंडी आता चक्क २५-३0 रुपयांवर पोहोचली आहे.