शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ओसाड माळरानावर फुलविली हिरवळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:34 IST

चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या ...

चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या प्रयत्नांमुळे या भागातील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर चार हजार झाडे रूजली असून वर्षभरापासून या संस्थेचे सदस्य झाडे लावण्यासह ते जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

तालुक्यातील टाकरखेड हेलगा शिवरातील वनजमीन वनराईने नटावी, यासाठी निसर्ग समृद्धी बहुउद्देशीय संस्था चिखली या वृक्षप्रेमी संस्थेने पुढाकार घेतल्याने या ओसाड जमिनीचे आता रूपडे पालटले आहे.

संस्थेच्या सदस्यांनी वृक्षारोपणासह संवर्धनासाठी घेतलेल्या कृतिशील पुढाकाराने आज रोजी तब्बल चार हजाराच्या आसपास लहान-मोठ्या वृक्षांची हिरवळ या भागात पसरली आहे. टाकरखेड हेलगा येथील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेने १६ जून २०२० पासून हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० तर दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०० असे एकूण ४ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण करताना प्रामुख्याने सर्व प्रकारची रोपे देशी प्रजातीची असावीत, या हेतूने वृक्षारोपांची निवड करण्यात आली. संस्थेने लावगड केलेल्या वृक्षारोपांपैकी ६५० रोपे हे देणगी स्वरूपात महाराष्ट्रासह परदेशातून मिळाले आहेत. वृक्षारोपण कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपण लागवड केलेली रोपे जगावीत व ओसाड बनलेला परिसर वनराईने नटवा याचा संकल्प हाती घेत लागवडी पश्चात अविरतपणे या वृक्षरोपांची निगा संस्थेच्या सदस्यांव्दारे घेतली जात आहे. संस्थेव्दारे संपूर्ण उन्हाळाभर हे काम केल्या जाणार असून या कार्यात वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन निसर्ग समृध्दी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

९० टक्के झाडे जगविली !

निसर्ग समृध्द संस्थेने गत पावसाळ्यात दोन टप्प्यात ४ हजार २०० रोपांची लागवड केली. यातील ९० टक्के झाडे जगली असून ओसाड परिसर हिरवागार झाला.

झाडे जगविण्यासाठी संस्थेच्यावतीने ठिबक पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. यासाठी पाण्याच्या रिकाम्या बॉटलचा वापर केला जात असून रिकाम्या बॉटल जमा करून त्यामध्ये पाणी भरून ते झाडांच्या मुळाशी ठेवले जात आहे. आजवर सुमारे ८०० झाडांना बॉटलचा आधार देण्यात आला आहे. उर्वरीत सुमारे ३ हजार २०० झाडांना पाणी बॉटल लावण्याचे काम संस्थेव्दारे सुरू आहे.