शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड माळरानावर फुलविली हिरवळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:34 IST

चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या ...

चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या प्रयत्नांमुळे या भागातील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर चार हजार झाडे रूजली असून वर्षभरापासून या संस्थेचे सदस्य झाडे लावण्यासह ते जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

तालुक्यातील टाकरखेड हेलगा शिवरातील वनजमीन वनराईने नटावी, यासाठी निसर्ग समृद्धी बहुउद्देशीय संस्था चिखली या वृक्षप्रेमी संस्थेने पुढाकार घेतल्याने या ओसाड जमिनीचे आता रूपडे पालटले आहे.

संस्थेच्या सदस्यांनी वृक्षारोपणासह संवर्धनासाठी घेतलेल्या कृतिशील पुढाकाराने आज रोजी तब्बल चार हजाराच्या आसपास लहान-मोठ्या वृक्षांची हिरवळ या भागात पसरली आहे. टाकरखेड हेलगा येथील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेने १६ जून २०२० पासून हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० तर दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०० असे एकूण ४ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण करताना प्रामुख्याने सर्व प्रकारची रोपे देशी प्रजातीची असावीत, या हेतूने वृक्षारोपांची निवड करण्यात आली. संस्थेने लावगड केलेल्या वृक्षारोपांपैकी ६५० रोपे हे देणगी स्वरूपात महाराष्ट्रासह परदेशातून मिळाले आहेत. वृक्षारोपण कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपण लागवड केलेली रोपे जगावीत व ओसाड बनलेला परिसर वनराईने नटवा याचा संकल्प हाती घेत लागवडी पश्चात अविरतपणे या वृक्षरोपांची निगा संस्थेच्या सदस्यांव्दारे घेतली जात आहे. संस्थेव्दारे संपूर्ण उन्हाळाभर हे काम केल्या जाणार असून या कार्यात वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन निसर्ग समृध्दी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

९० टक्के झाडे जगविली !

निसर्ग समृध्द संस्थेने गत पावसाळ्यात दोन टप्प्यात ४ हजार २०० रोपांची लागवड केली. यातील ९० टक्के झाडे जगली असून ओसाड परिसर हिरवागार झाला.

झाडे जगविण्यासाठी संस्थेच्यावतीने ठिबक पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. यासाठी पाण्याच्या रिकाम्या बॉटलचा वापर केला जात असून रिकाम्या बॉटल जमा करून त्यामध्ये पाणी भरून ते झाडांच्या मुळाशी ठेवले जात आहे. आजवर सुमारे ८०० झाडांना बॉटलचा आधार देण्यात आला आहे. उर्वरीत सुमारे ३ हजार २०० झाडांना पाणी बॉटल लावण्याचे काम संस्थेव्दारे सुरू आहे.