शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज पुनर्गठनासाठी पाच हजारांची मागणी

By admin | Updated: June 26, 2015 01:29 IST

पीककर्ज पुनर्गठनासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार.

लोणार (जि. बुलडाणा) : तालुक्यातील किनगावजट्ट येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्‍यांकडे पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार कासारी येथील महिला शेतकरी उमा तळेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे २३ जून रोजी निवेदनाद्वारे केली. गतवर्षी झालेल्या अल्प पावसामुळे पिकांच्या उत्पादनात झालेली घट तसेच उत्पादित शेतीमालाला मिळालेल्या कवडीमोल दराने शेतकर्‍यांचा पीक लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने मेटाकुटीस आलेला शेतकरी यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पैशाअभावी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जुन्या पीककर्जाची परतफेड न केल्यामुळे नवीन पीककर्जाचे पुनर्गठन अजूनही राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुरू झालेले नाही. तालुक्यातील किनगावजट्ट येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून परिस्थितीचा फायदा घेऊन पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्‍यांमधून पाच हजारांची मागणी होत असल्याची तक्रार कासारी येथील महिला शेतकरी उमा राजेभाऊ तळेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे २३ जून रोजी केली. सदर निवेदनात उमा तळेकर यांनी किनगावजट्ट येथील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापकांकडून शेतकर्‍यांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेतला आहे. पीककर्ज पुर्नगठन करणार्‍या शेतकर्‍यांची पिळवणूक सुरू आहे. या विषयात चौकशी करुन खरीप पेरणीकरिता पीककर्ज तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी महिला शेतकरी उमा तळेकर यांनी केली आहे.