लोणार (जि. बुलडाणा) : तालुक्यातील किनगावजट्ट येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार कासारी येथील महिला शेतकरी उमा तळेकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे २३ जून रोजी निवेदनाद्वारे केली. गतवर्षी झालेल्या अल्प पावसामुळे पिकांच्या उत्पादनात झालेली घट तसेच उत्पादित शेतीमालाला मिळालेल्या कवडीमोल दराने शेतकर्यांचा पीक लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने मेटाकुटीस आलेला शेतकरी यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पैशाअभावी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जुन्या पीककर्जाची परतफेड न केल्यामुळे नवीन पीककर्जाचे पुनर्गठन अजूनही राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुरू झालेले नाही. तालुक्यातील किनगावजट्ट येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून परिस्थितीचा फायदा घेऊन पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्यांमधून पाच हजारांची मागणी होत असल्याची तक्रार कासारी येथील महिला शेतकरी उमा राजेभाऊ तळेकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे २३ जून रोजी केली. सदर निवेदनात उमा तळेकर यांनी किनगावजट्ट येथील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापकांकडून शेतकर्यांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेतला आहे. पीककर्ज पुर्नगठन करणार्या शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. या विषयात चौकशी करुन खरीप पेरणीकरिता पीककर्ज तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी महिला शेतकरी उमा तळेकर यांनी केली आहे.
पीककर्ज पुनर्गठनासाठी पाच हजारांची मागणी
By admin | Updated: June 26, 2015 01:29 IST