शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाच वनराई बंधा-यांमुळे केदार नदी तुडुंब!

By admin | Updated: October 29, 2016 02:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात लोकसहभागातून जलक्रांती!

सुहास वाघमारे नांदुरा, दि. २८- नायगाव परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केदार नदीवर पाच वनराई बंधारे तयार केले असून, त्यामुळे नदीचे पात्र तुडुंब पाण्याने भरले आहे. परिसरातील कोलासर, तिकोडी, शेलगाव मुकुंद व नायगाव या चार गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. नायगाव येथील निनाजी तायडे यांनी गावातील नागरिकांजवळ लोकसहभागातून वनराई बंधारे बांधून जलसंवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला. केदार नदी पात्रात पाच बंधारे तयार करण्याचे ठरले. त्याकरिता देवेंद्र डामरे, रमेश डामरे, केदार ढोरे, सचिन तायडे, मयूर तायडे, नितीन तायडे, भागवत डामरे, आशिष तायडे, सभापती अनिल इंगळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी व गावकरी आदींनी त्या पाच बंधार्‍यांचा आर्थिक भार उचलला. प्रत्येक वनराई बंधारा हा आठ ते दहा फूट रुंद व सहा ते सात फूट उंच माती, मुरूम व रेतीच्या सहाय्याने तयार करण्यात आला. त्या बंधार्‍यातून पाणी पाझरू नये, याकरिता प्लास्टिक कागद व ताडपत्री याचा वापर करून पाणी साठविण्यात आले आहे. या प्रयत्नामुळे तीन किलोमीटर नदी पात्रात पाणी साठले असून, भूजल पातळीत झपाट्याने वाढ झाली. याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांना होत आहे. कोणताही शासकीय निधी व अधिकार्‍यांचे सहकार्य न घेता लोकसहभागातून झालेली ही जलक्रांती प्रेरणादायी आहे. या उपक्रमात त्यांना पंचायत समिती सभापती अनिल इंगळे, दिनकर गारमोडे, रामकृष्ण सपकाळ, नारायण डामरे, सुयोग माहुलकार, भागवत डामरे, गोविंदा चोपडे, गणेश सपकाळ, वाघ तसेच गावकर्‍यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. बंधारे बांधणारा अवलीया.नायगाव येथील निनाजी तायडे हे नायगाव येथील मानधन तत्त्वावर काम करणारे पोस्ट मास्टर आहेत. त्यांच्या नोकरीनंतरच्या वेळेत गावात स्वच्छता व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या तायडे यांना जलसंवर्धनाचे वेड आहे. प्रत्येक वर्षी गावातील तरुणांना एकत्रित करून लोकसहभागातून बंधारे गाव परिसरात व बाहेर तयार करण्यात ते पुढाकार घेतात. या कामासाठी आर्थिक झीजही त्यांना सोसावी लागते.-नायगाव येथील गावकर्‍यांनी लोकसहभागातून पाच बंधारे तयार केले असून, नदीचे पात्र तीन किलोमीटरपर्यंंत तुडुंब भरले आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. लोकसहभागातीलही जलक्रांती प्रेरणादायी आहे.- अनिल इंगळे,सभापती पं.स. नांदुरा.