शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अवकाळी पावसादरम्यान बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:27 IST

नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.या घटना प्रामुख्याने चिखली, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात घडल्या. विशेष म्हणजे याच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसादरम्यान आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. आॅक्टोबर महिन्यात चिखली तालुक्यात गिता राजेंद्र गोलाईत या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात किसन नारायण म्हस्के, रविंद्र बाबुराव गायकवाड, नारायण संतोष गायकवाड आणि रविंद्र दशरथ जाधव या चार व्यक्तींचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती विभागातून प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे हे मृत्यू झाले. दरम्यान, आता शासनस्तरावर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्यांना काय मदत शासन देते याकडे सध्या लक्ष लागून आहे.दुसरीकडे जिल्ह्यात या पावसामुळे २१ गुरांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात ही पशु हानी झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील नोंदी स्पष्ट करतात. २०१४-१५ या वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात अवकाळी पावसाने व्यापकस्तरावर पिकांची आणि जिवीत हानी केली आहे.११ घरांची पडझडअवकाळी पावसादरम्यान जिल्ह्यात ११ घरांची पडझड झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. यामध्ये एका झोपडीचाही समावेश आहे. शेगाव मलकापूर आणि बुलडाणा या तालुक्यात हे नुकसान आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस