शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:47 IST

धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

- नवीन मोदेधामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आठ एप्रिल रोजी सुरू झालेली ही स्पर्धा आता २२ मे ऐवजी २७ मे रोजी संपेल. त्यामुळे राज्यातील ७६ तालुक्यातील सहा हजार गावांना अधिक चांगले काम करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे.या वर्षीची दुष्काळी परस्थिती, निवडणुकीची आचार संहिता ह्या सर्व बाबी विचारात घेता पाणी फाऊडेशनतर्फे स्पर्धा काळात पाच दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय आठ मे रोजी घेण्यात आला आहे.मागील चार वर्षापासून राज्यातील ९० टक्के दुष्काळी भागात आठ एप्रिल ते २२ मे या दरम्यान ही स्पर्धा ४५ दिवस सर्व राज्यभर राबविली जाते. परंतू यावर्षी स्पर्धेचा कालावधी ५० दिवसांचा राहील. त्यानुसार २७ मे पर्यंत सहभागी गावांना कामे करता येतील. २८ मे रोजी कामाचे मोजमाप व तपासणी होईल. संपूर्ण राज्यात दुष्काळामध्ये हजारो गावे होरपळी जात आहेत. गावकर्यांची एकजूट आणि  श्रमदानाच्या जोरावर लोकांमध्ये जनजागृती करून जलसंवर्धनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करून घेण्यात पाणी फाऊंडेशन यशस्वी होत आहे. २०१६ मध्ये अवघ्या तीन तालुक्यात, २०१७ मध्ये ३० तालुक्यात, २०१८ मध्ये ७५ तालुक्यात आणि २०१९ मध्ये ७६ तालुक्यातील सहा हजार गावापर्यंत दुष्काळाला हद्दपार करणारी लोकचळवळ आता पोहोचली आहे.या वर्षी स्पर्धाकाळाच्या पाच दिवसांच्या मुदतवाढीने सहभागी गावांना आपली कामे अधिक चांगली करण्यासाठी पुरेसा वेळ व बळ मिळेल, अशी माहिती पाणी फाऊंडेशनच्या समन्वयक बिंदिया तेलगोटे यांनी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाbuldhanaबुलडाणा