शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:47 IST

धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

- नवीन मोदेधामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आठ एप्रिल रोजी सुरू झालेली ही स्पर्धा आता २२ मे ऐवजी २७ मे रोजी संपेल. त्यामुळे राज्यातील ७६ तालुक्यातील सहा हजार गावांना अधिक चांगले काम करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे.या वर्षीची दुष्काळी परस्थिती, निवडणुकीची आचार संहिता ह्या सर्व बाबी विचारात घेता पाणी फाऊडेशनतर्फे स्पर्धा काळात पाच दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय आठ मे रोजी घेण्यात आला आहे.मागील चार वर्षापासून राज्यातील ९० टक्के दुष्काळी भागात आठ एप्रिल ते २२ मे या दरम्यान ही स्पर्धा ४५ दिवस सर्व राज्यभर राबविली जाते. परंतू यावर्षी स्पर्धेचा कालावधी ५० दिवसांचा राहील. त्यानुसार २७ मे पर्यंत सहभागी गावांना कामे करता येतील. २८ मे रोजी कामाचे मोजमाप व तपासणी होईल. संपूर्ण राज्यात दुष्काळामध्ये हजारो गावे होरपळी जात आहेत. गावकर्यांची एकजूट आणि  श्रमदानाच्या जोरावर लोकांमध्ये जनजागृती करून जलसंवर्धनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करून घेण्यात पाणी फाऊंडेशन यशस्वी होत आहे. २०१६ मध्ये अवघ्या तीन तालुक्यात, २०१७ मध्ये ३० तालुक्यात, २०१८ मध्ये ७५ तालुक्यात आणि २०१९ मध्ये ७६ तालुक्यातील सहा हजार गावापर्यंत दुष्काळाला हद्दपार करणारी लोकचळवळ आता पोहोचली आहे.या वर्षी स्पर्धाकाळाच्या पाच दिवसांच्या मुदतवाढीने सहभागी गावांना आपली कामे अधिक चांगली करण्यासाठी पुरेसा वेळ व बळ मिळेल, अशी माहिती पाणी फाऊंडेशनच्या समन्वयक बिंदिया तेलगोटे यांनी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाbuldhanaबुलडाणा