शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात आग प्रतिबंधक यंत्रणा

By admin | Updated: November 28, 2015 02:40 IST

ज्ञानगंगामध्ये फायर लाइन, सात अग्निरक्षक पथके तैनात.

नीलेश जोशी /खामगाव : दुर्मीळ औषधी वनस्पतींसह वन्य जिवांची भरमार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याला दरवर्षी लागणार्‍या आगीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने अग्निप्रतिबंधक यंत्रणा नोव्हेंबरपासून कार्यान्वित झाली आहे. दरम्यान, बुलडाणा-खामगाव या अभयारण्यातून जाणार्‍या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा कंट्रोल बर्निंंंग करण्यासाठी यंत्रणेने सध्या पावले टाकली आहेत. दोन वनपरीक्षेत्रात तथा चार तालुक्यांचा २0५.२१ चौरस किमी भाग व्यापलेल्या या अभयारण्याची गेल्या दोन ते तीन वर्षात नोव्हेंबर ते जूनदरम्यान लागलेल्या जवळपास सात आगीमुळे मोठी हानी झाली होती. येथील जैवविविधतेलाही त्याचा फटका बसला होता. त्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाने १८ नोव्हेंबरपासूनच जाळ रेषेचे काम येथे हाती घेतले आहे. सध्या जवळपास सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूकडील काम पूर्णत्वास केले असून, बुलडाणा-खामगाव मार्गापासून दहा मीटर अंतरावर जाळ रेषा निर्माण करण्यात आली आहे. यासाठी सध्या सात महिला रस्त्यालगतचे गवत कापत असून, लवकरच कंट्रोल बर्निंंंगला अभयारण्यात प्रारंभ करण्यात येणार असल्याचे वन्य जीव विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्‍या बुलडाणा-खामगाव मार्गाची दुतर्फा बाजून ही आगीच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने येथील जाळ रेषेचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यालगतच्या दहा मीटर परिसरातील दोन्ही बाजूला असलेले गवत व काडीकचरा नियंत्रित आग लावून अल्पावधीतच नष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने होणार्‍या वाहतुकीमुळे किंवा वाटसरूच्या अनावधानाने अभयारण्यास लागणारी आग रोखण्यास मदत मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.