शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अखेर माेताळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

शहराला नगर पंचायतच्या मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये. तसेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण ...

शहराला नगर पंचायतच्या मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये. तसेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी येथील नगर पंचायत प्रशासन प्रयत्नरत होते. परंतु दुसरीकडे शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या शहरातील असंख्य नागरिकांच्या तोंडी व लेखी तक्रारी होत्या. शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायत प्रशासन प्रयत्नरत असताना ऐन पावसाळ्याला सुरुवात झाली.

पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे १२ जून रोजी शहराला पाणीपुरवठा करणारे मोटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळगंगा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने शहराला शुद्ध आणि अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायत मध्ये ठिय्या आंदोलन करून नगर पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. १७ जून रोजी संध्याकाळी मोटार पंप बसवून १८ जून रोजी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

शुद्ध पाण्याचा पुरवठा करा

माेताळा शहरात गत काही दिवसांपासून पिवळसर पाण्याचा पुरवठा हाेत आहे़ त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करावी तसेच शहराला नळाद्वारे येत असलेल्या पाण्यामध्ये ब्लिचिंग तथा तुरटीचा वापर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने नगर पंचायतने याकडे लक्ष देण्याची गरज आहे़