शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर अलमपूर येथे निघाली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 02:33 IST

तब्बल दोन तपांनंतर निघाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त मिरवणूक.

नांदुरा (जि. बुलडाणा ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील अलमपूर येथे २४ वर्षांनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात व उत्साहात सोमवारी मिरवणूक पार पडली. अलमपूर येथील मिरवणुकीला परवानगी नसल्याने गेल्या २४ वर्षांपासून येथे भीम जयंती मिरवणूक काढल्या जात नव्हती. याबाबत यावर्षी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर प्रशासनाने भीम जयंती मिरवणूक १८ एप्रिल रोजी काढण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानुसार १८ रोजी सकाळी ९ वाजता बुद्ध विहार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार चैनसुख संचेती, अशांत वानखेडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे, भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष राजरत्न तायडे यांच्यासह महिला व पुरुष मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर समारोपीय सभा घेण्यात आली. आ.संचेती, अशांत वानखडे, भीमराव तायडे यांच्यासह सरपंच कमल शेळके यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. पोलीस प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून अलमपूर येथे येणार्‍या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती. मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७ पोलीस निरीक्षक, ८ सहा. पो.निरीक्षक, १६ पीएसआय, १५८ पोलीस कर्मचारी, ४६ महिला कर्मचारी, २ आरसीपी पथक, २ स्ट्रायकींग फोर्स, १ एसआरपी तुकडी व अन्य २७ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्यावतीने लावण्यात आल्याने अलमपूर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हा मिरवणूक सोहळा शांततेत पार पडल्यानंतर भीम अनुयायांनी आनंद व्यक्त केला असून, ही परंपरा आता दरवर्षी कायम व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.