अमडापूर : शेतीच्या वादातून दाेन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे २१ जून राेजी सकाळी ११ वाजता घडली. या प्ररकणी परस्परविराेधी तक्रारीवरून पाेलिसांनी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कमलाबाई भगवान जाधव, रा. श्रीकृष्ण नगर यांनी अमडापूर पाेलिसांंत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी पंडित पिवतकर, अनिल पिवतकर, भगवान पिवतकर, विश्वंभर पिवतकर, सचिन पिवतकर, पमसा पिवतकर, इंदुबाई पिवतकर, लताबाई सोनुने, शिरामन सोनुने, हनुमान दुतोंडे, रा. श्रीकृष्ण नगर यांनी शेतीच्या पेरणीवरून माझ्या सुनेला कुऱ्हाड व काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पाेलिसांनी आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटाच्या अनिल प्रकाश पिवतकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दादाराव बाजीराव जाधव व अन्य १७, सर्व रा. श्रीकृष्ण नगर यांनी पेरणीच्या कारणावरून वाद घातला तसेच मारहाण केली. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी १८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.