शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जानेफळ परिसरात सर्दी, खोकल्यासह तापेचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार ...

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार जण आजारी पडलेले दिसत आहेत. ज्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, सध्या शेतातील काम धंद्याचे दिवस असताना ते सोडून दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. अशातच खासगी दवाखान्यातील इंजेक्शन व सलाइनचे दर सुद्धा वाढविण्यात आले असल्याने याचा फटका जनतेला सोसावा लागत आहे. सर्दी व खोकला हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा लगेच फैलाव होत आहे. पावसाळ्यामुळे आलेले नवीन पाणी पचण्यास बाधक ठरत असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांंमधील घाण पाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याने ताप व इतर आजारांचे रुग्ण सापडत आहेत.

ओपीडी वाढली

दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात या आजाराचे प्रमाण बळावत असते. त्यानुसार यावर्षी अल्प पाऊस आणि त्यातच उन्हाळ्याप्रमाणेच असलेले गरमीचे वातावरण हे आरोग्यास बाधक ठरत असल्याने या आजाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.

रुग्णांनी व जनतेने काळजी घ्यावी : सरपाते

आजारी रुग्णांनी घरगुती उपचार न करतात तज्ज्ञ डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय अशा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा. उपचारात निष्काळजी करू नये. तसेच जनतेने व्हायरल फीवर, जलजन्य आजार, विषाणूजन्य आजार इत्यादीपासून बचावासाठी पाणी उकळून प्यावे. घर, परिसर स्वच्छ ठेवावे आणी डास व मच्छरांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी केले आहे.