शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

खत, बियाण्यांचे भाव दुपटीने वाढले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड ...

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड केलेला भाजीपालाही कडक निर्बंधामुळे विक्री करता येत नाही. पेरणीपूर्वी शेतीमध्ये मशागतीत शेतकरी गुंतला असून १५ दिवसांनी शेतामध्ये पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी महाग झाले आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. एकीकडे कडक निर्बंधांमुळे पीक कर्ज मिळविण्यास व पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. पीक कर्ज हे पेरणीपूर्वी वेळेवर मिळत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे पेरणीपूर्वी शेतातील ट्रॅक्टरद्वारे कामे करताना डिझेलचे भाव वाढल्याने जास्तीचे पैसे देऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे भाव गगनाला भिडले असून आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने रासायनिक खताचे व कृषी बियाण्यांचे भाव कमी करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.