शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:22 IST

Buldhana News : पन्यांनी खतांच्या किमतीत सुमारे ६०० ते ८०० रुपयांच्या फरकाने मोठी वाढ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर कंपन्यांनी खतांच्या किमतीत सुमारे ६०० ते ८०० रुपयांच्या फरकाने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच लागवड खर्च दुप्पट होणार असून, शेतकऱ्यांचे बजेट खतांच्या भावाने बिघडले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना ६ हजार रुपये  वार्षिक सन्मान निधी देण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे खत दरवाढीतून त्याच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करायची, असे दुटप्पी धोरण केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे ही भाववाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खा.प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.नैसर्गिक आपत्तीची सुरू असलेली मालिका त्यातच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनचा सामना गतवर्षीपासून शेतकरी करत आहेत. भाजीपाला आणि नगदी पिकांचे रास्त भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालण्यात यावे, असेही १८ मे रोजी पाठविलेल्या पत्रात खा.जाधव यांनी नमूद केेल आहे. साधारणतः पाच एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी जर आपण डोळ्यासमोर ठेवला, तर त्याला वर्षभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक धरून १५ बॅग खत लागते. त्यामुळे एका खताच्या बॅगमागे सहाशे ते सातशे रुपये वाढले आहेत. त्यामुळे खताच्या खरेदीसाठी दहा हजार रुपये अधिकचे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत. 

भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष सन्मान निधी मिळतो, पण तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हे धोरण बदलावे. या भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असे खा.जाधव यांनी म्हटले आहे. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी खत दरवाढीचा बोजा त्यांच्यावर लादून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांनी या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष घालून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी