शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

मोताळ्याचा पारा ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 16:04 IST

एप्रिल हिटचा तडाखा; उन्हाच्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही

मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने तालुकावासियांची तगमग होत आहे. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होणार उकाडा त्यात भर घालत असल्याने मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे.    मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या उन्हाचा तडाखा तालुकाभरात तीव्र  असून १९ एप्रिल रोजी मोताळा शहराच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअस टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरवाड्यापासून तापमानाचा आलेख उंचावत आहे. दिवसा ३९ ते ४४ अंश सेल्सिअश तर संध्याकाळी २२ ते २५ अंश सेल्सिअशपर्यंत तापमान राहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वाढत्या उन्हाच्या झळांनी सर्व नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तापमानाची सकाळ-संध्याकाळ कायम राहत असल्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची तीव्रता सहन करावी लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून वाढत्या उष्णतेचा आरोग्यवरही परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाबरोबरच कमी दाबाचा परिणाम निघाल्यावर असह्य उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढल्यामुळे शहरातील व्यापार मंदावला आहे. वाढत्या उन्हामुळे वन्यजीवांची होरपळ होत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखीआदी विषाणुजन्य आजारचे रूग्ण आढळून येत आहेत. खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या उष्ण झळा डोळ्यांसाठी धोकादायक धोक््याच्या ठरत आहेत.वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होत आहेत. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत असून, दुपारचे उन टाळून  अनेक जण सायंकाळी खरेदी करणे पसंत करीत आहे. वाढत्या तापमानामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, घरोघरी कुलर, पंख्याचा वापर  वाढला आहे. कोल्डड्रिंक, रसवंती,आईस्क्रिम, ज्यूस सेंटरवर गर्दी वाढल्याचे दिसून येत आहेत. उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथ रोगाची शक्यता अधिक असते. असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी तब्येत सांभाळा, चिमुकल्याना उन्हात घेऊन जाऊ नका, उन्हात निघणे टाळा, जाणे गरजेचे असल्यास खाऊन व भरपूर पाणी पिऊनच निघावे, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, डोळयावर चांगल्या प्रतीचा गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा किंवा रूमाल वापरावा, प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तीव्र उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होऊन संचार बंदी लागल्यासारखे दिसून येत आहेत. उन्हात फिरणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.