शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पश्चिम व-हाडातील संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ किडीचा प्रादूर्भाव; संत्राउत्पादक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:23 IST

खामगाव :  पश्चिम विदर्भातील अर्थकारणाला मोठा हातभार लावणा-या संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ या किडीची लागण झाल्यामुळे संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात ७०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संत्राउत्पादकांचे यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील ७२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  पश्चिम विदर्भातील अर्थकारणाला मोठा हातभार लावणा-या संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ या किडीची लागण झाल्यामुळे संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात ७०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संत्राउत्पादकांचे यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे. सोबतच, साल खाणा-या या अळीमुळे झाडालाच धोका निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरसह अमरावती जिल्ह्यातही याची लागण झाल्याचे समोर येत आहे.

 खामगाव उपविभागातील संग्रामपूर तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शिटाकळी  आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा फळपिकांवर काही ठिकाणी साल खाणारी अळी व फायटोप्योरा रोग आढळून आला आहे. साल खाणारी अळी मुख्यत्वे नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात दिसून येते, त्याचप्रमाणे संत्र्यांच्या जुनाट दुर्लक्षीत बागेत या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच पश्चिम विदर्भातील अनेक संत्रा बागायतीमध्ये फायटोप्योरा रोगाचे सुध्दा प्रमाण वाढले आहे. दरम्यान, दृष्काळी परिस्थिती, वातावरणातील बदलानंतर आता शेतकºयांना विविध कीड रोगांचाही सामना करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात सुमारे ७२  हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड केली जाते. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड होते. यामध्ये अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चिखलदरा, धारणी, दर्यापूर या तालुक्यांच्या समावेश आहे. तर अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यात संत्रा पिक घेतल्या जाते. अकोला जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर संत्रा पिकाची लागवड होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर आणि खामगाव तालुक्यातील सुमारे ४ हजार हेक्टरवर तर वाशिम जिल्ह्यात १२०० हेक्टर परिसरात संत्र्याची लागवड होते.  दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम वºहाडातील बहुताशं ठिकाणी साल खाणाºया अळीसोबतच, ‘फायटोप्योरा’ या रोगाची लागण झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या आजाराच्या बचावासाठी कृषी विभागातंर्गत तज्ज्ञांकडून पाहणी केली जात असून विविध उपाययोजना सांगितल्या जात आहेत. 

कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम!दृष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस या पासून बचाव करीत जोपासलेल्या संत्रा पिकाला आता किडीची लागण होत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरीही खचला आहे. दृष्काळी परिस्थितीत कर्जाचा डोंगर करीत मशागत केलेल्या शेतीतून उत्पादनाऐवजी पिकांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात साडे आठशे कोटींची उलाढाल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दीडशे कोटींच्या जवळपास उलाढालीवर परिणाम जाणवणार असल्याचे संकेत आहेत. 

उपाय योजना करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला!

  •  फायटोप्योराच्या नियंत्रणासाठी संत्रा बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट झाडाच्या खोडाला लावावी, गरज असल्यास या रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील एमझेड ०.२ टक्के किंवा अलाईट ०.२ टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • साल खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी अळीने छिद्र पाडलेल्या भागात केरोसीन, पेट्रोल, मोनोफ्रोटीफ्रास किंवा डायक्लोस्व्हॉस १ टक्के यापैकी एक छिद्रामध्ये सोडून कापसाच्या बोळ्याने छिद्र बंद करावे. आवश्यकता भासल्यास प्रादुर्भावग्रस्त भाग स्वच्छ करुन मोतोफ्रोटोफ्रॉस किंवा ३-५ एमएल डायक्लोरव्हॉस १ टक्के यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी,असा सल्ला कृषी विभागाकडून दिल्या जात आहे.
टॅग्स :khamgaonखामगाव