शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भीती आणि अनिश्चितता अफवांना जन्म देते -डॉ. विश्वास खर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:32 IST

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी व्यक्त केला.त्यांच्याशी साधलेला संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनो संसर्गाचे जगातील थैमान भीतीदायक स्थिती व अनिश्चितता निर्माण करत असल्याने अफवांना जन्म मिळत आहे. त्यामुळे त्याच्या मुळाशी जावून त्यातील विश्वाहार्यता तपासण्याचे काम केले जावे. म्हणजे आपल्यातील भीती दुर होईल. अफवांमुळे काळजी व चिंता निर्माण होते. परंतू काळजी ही सकारात्मक माणूस करतो व त्यातून प्रतिबंधासाठी उपाययोजना करतो. मात्र चिंता करणारा व्यक्ती खचून जातो व चुकीच्या दिशेने जातो. त्यामुळे अशा स्थितत मानसिक संतुलन राखून स्वत:सोबतच कुटुंबासाठी घरात ठरावीक वेळ देणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी व्यक्त केला.त्यांच्याशी साधलेला संवाद...

लॉकडाऊनमध्ये दिवसभराचे नियोजन कसे करावे?

होम लॉकडाऊनमुळे नागरिक वैतागले असून अनेकांना अकारण चिंता भासते आहे. सध्या लॉकडाऊनमुळे माणूस काहीसा वैतागत असला तरी त्याने यासंधीचा सकारात्मक वापर करावा. मानसिक संतुलन राखण्यासाठी स्वत:साठी काही काळ त्याने द्यावा. सोबतच कुटुंबासाठीही वेळ द्यावा. आपले जुने छंद जोपासावे. या संसर्गाच्या साथीत घरात राहून आपण स्वत:सोबत शासनालाच मदत करत आहोत.यामध्ये दिवसभराचा आपला आराखडा तयार करावा. घरातच एक तास हलका फुलका व्यायाम, थोडावेळ वाचन, काहीकाळ कुटुंबामध्ये समरस होणे, नातेवाईकांशी फोनवरून काही काळ गप्पा. केवळ टिव्हीसमोर त्याच बातम्या बघून नकारात्मकता येते.

अफवांबाबत काय सांगाल?

चिंता करणाºया व्यक्तीला सर्वत्र अनिश्चितता दिसते. त्यातून त्याला मिळणाºया माहितीतून अफवा निर्माण होतात. भीतीदायक गोष्टीकडे माणूस आकर्षीत त्यातून अफवा जन्मतात.

भावनिक नियमन म्हणजे काय़?

कोरोना संसर्गाच्या भितीमुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहे तर काही या परिस्थितीचे शुल्लकीकरण करत आहे. दोघेही सामाजिक परिस्तिती बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा परिस्थिीतून मार्ग काढण्यासाठी भावनिक नियमन करण्याची गरज आहे. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून राहता येणे हे खरे जीवन कौशल्य आहे. त्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीचा संधी म्हणून उपयोग करा. कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व समजून घ्यावे. शासनाकडून मिळणारे निर्देश हे सर्वांच्या स्व हितासाठीच आहेत. ते समजणे गरजेचे आहे.

लाईफ मिन्स हॅव्ह मोअर या संकल्पनेतून बाहेर पडण्याची ही नामी संधी लॉकडाऊनच्या रुपाने आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा संधी म्हणून वापर करत कुटुंबाला वेळ द्यावा. आनंदी व सकारात्मक रहावे.अफवांची साखळीही ब्रेक करण्यासाठी माहिती विश्वासाहर्य स्त्रोताकडून असल्याची खात्रीकरून घ्या व अफवेला ब्रेक लावा - डॉ. विश्वास खर्चे

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस