शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

शेतकरी संघटनेचे कर्जमुक्तीसाठी उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:48 IST

बुलडाणा: शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अभिनव उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादात शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची देशाला गरज असल्याचे भूमिका नामदेव जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपरिसंवादाचे आयोजन मिरवणुकीद्वारे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अभिनव उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादात शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची देशाला गरज असल्याचे भूमिका नामदेव जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. स्व. शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येथील जयस्तंभ चौकातील गांधीभवन येथे जमा झाले होते. १२ वाजेच्या सुमारास स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जोशी यांच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. जयस्थंभ चौक येथून स्टेट बँक चौक मार्गे संगम चौक ते गांधी भवन मार्गे निघालेल्या मिरवणुकीत ‘इडा पीडा टाळणार आहे, बळीचे राज्य येणार आहे’, ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मिरवणूक गांधी भवन येथे दाखल होताच शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफी आणि वीज बिल मुक्तीसाठी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात करण्यात आली. ‘मी अनुभवलेले शरद जोशी’ या परिसंवादात  नामदेव जाधव यांनी शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची आज देशाला गरज असल्याचे सांगून जोशी यांच्या विचारांशिवाय शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ येऊ शकणार  नसल्याचे सांगितले. अव्यहारी स्वामिनाथन आयोगापेक्षा स्व. शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवाल लागू करण्याची मागणीही जाधव यांनी यावेळी केली. डॉ. हासन देशमुख यांनी कर्जमाफीवरून सरकारचा खरपूस समाचार घेत फसव्या कर्जमाफीपेक्षा शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. एकनाथ पाटील यांनी शरद जोशी यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. यावेळी देवीदास कणखर, विनायक वाघ, आशा धूड, मंदा अंभोरे, रेखा खांडेभराड, उषा थुटे, समाधान कणखर, रविराज शेळके, दामोधर शर्मा, ज्ञानेश्‍वर जाधव, सुरेश दादा यांच्यासह इतरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पवन देशमुख, प्रदीप गोरे सुंदरखेड यांनी नामदेव  जाधव व डॉ. हासन देशमुख यांच्या मार्गदर्शनात शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्‍वर जाधव, डॉ. विनायक वाघ, प्रकाश अंभोरे, विजय गायकवाड, सादिक देशमुख, कलीम सेठ, शिवाजी सोनुने, बाबुराव पाटील, हरिदास खांडेभराड, संतोष राजपूत, तन्वीर देशमुख, नवृत्ती साळवे, अनिल मिसाळ, सुगदेव नरोटे, दासा कणखर, मुजमुळे, शेषराव पाटील, भिका सोलनकी, पका घुबे, मुरली महाराज येवले, राजू शेटे, मधुकर गहुभे, देवीदास भगत, राजू पाटील, रतिराम शेळके, बडे, भानुदास गहुभे, विजयकुमार डागा, मदन लखाने, प्रल्हाद ठाकूर, शरद सावजी, तेजराव मुंडे, मेरत, पवार, प्रद्युमन सोनटक्के, दिनकर टेकाळे, मधुकर देठे, रमेशसिंग चव्हाण, दिगंबर चिंचोले आदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.  

फुगड्या खेळत शरद जोशी यांचा जन्मोत्सव साजरामिरवणुकीदरम्यान शेतकरी नेते नामदेव जाधव, शाहीर खांडेभराड यांनी हलगीच्या तालावर ताल धरत फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली. त्यानंतर संघटनेच्या शेतकरी महिलाही मागे राहिल्या नाही. हलगीच्या तालावर एकमेकांच्या हातात हात गुंफत महिलांनी फुगड्या खेळून स्व. जोशी यांचा जन्मोत्सव साजरा केला. हलगीच्या तालावर रंगलेल्या महिला-पुरुषांच्या फुगड्या लक्षवेधी ठरल्या.