शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शेतक-यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: January 21, 2017 02:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाभर सभा.

बुलडाणा, दि. २0- विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोझा असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सुरुवातीला त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी वानखेड येथे पार पडलेल्या सभेत दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन संग्रामपूर, शेगाव व खामगाव तालुक्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश चोपडे, प्रशांत डिक्कर, कैलास फाटे, श्याम अवसळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांना भरघोस मदतीची गरज आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर करणार्‍या उमेदवारांना धडा शिकवा. भ्रष्ट पुढार्‍यांना निवडणुकीत पराभतू करा, त्यामुळे नेते भ्रष्टाचार करणार नाहीत. शेतकर्‍यांसाठी कार्य करणार्‍या वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्‍या नेत्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत अमाप खर्च न करता, दारू व पैशांचे वाटप न करताही निवडणुका जिंकता येतात, हे मी निवडून येऊन सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. ना. रविकांत तुपकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले, की शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांची विशेष व्होट बँक तयार करायला हवी. शेतकरी हे शेतीच्या मुद्यावर निवडणुकीत मतदान करीत नाहीत. त्यामुळे त्यांची मते विभागल्या जातात. तसेच आगामी निवडणुकीत स्वाभिमानी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ना. तुपकर यांनी सांगितले.