शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

शेतक-यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: January 21, 2017 02:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाभर सभा.

बुलडाणा, दि. २0- विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोझा असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सुरुवातीला त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी वानखेड येथे पार पडलेल्या सभेत दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन संग्रामपूर, शेगाव व खामगाव तालुक्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश चोपडे, प्रशांत डिक्कर, कैलास फाटे, श्याम अवसळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांना भरघोस मदतीची गरज आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर करणार्‍या उमेदवारांना धडा शिकवा. भ्रष्ट पुढार्‍यांना निवडणुकीत पराभतू करा, त्यामुळे नेते भ्रष्टाचार करणार नाहीत. शेतकर्‍यांसाठी कार्य करणार्‍या वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्‍या नेत्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत अमाप खर्च न करता, दारू व पैशांचे वाटप न करताही निवडणुका जिंकता येतात, हे मी निवडून येऊन सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. ना. रविकांत तुपकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले, की शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांची विशेष व्होट बँक तयार करायला हवी. शेतकरी हे शेतीच्या मुद्यावर निवडणुकीत मतदान करीत नाहीत. त्यामुळे त्यांची मते विभागल्या जातात. तसेच आगामी निवडणुकीत स्वाभिमानी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ना. तुपकर यांनी सांगितले.