शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

जमीन खरडून गेलेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

लोणार तालुक्यातील ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडले; कास्तकार अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत.

लोणार : गतवर्षी झालेल्या ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील ३ हजार १२ शेतकर्‍यांचे ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडून गेल्याने शेतकर्‍याच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेले शेतकरी वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत मदतीच्या प्रतिक्षेत असून खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर चिभडे यांनी केली आहे. गतवर्षी २३ जुलै २0१३ रोजी तालुक्यात एका दिवसात ४२0 मीमी १७ इंच एवढा पाऊस पडल्याने तालुक्यातील आठही जलाशये १00 टक्के भरली होती.नद्या नाल्यांना पूर आल्याने नदी नाल्याकाठच्या शेताचे मोठे नुकसान झाले होते. ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील टिटवी, गोत्रा, नांद्रा, रायगाव, धाड, गायखेड, देऊळगाव कुंडपाळ, येवती, वझर आघाव, चिंचोली सांगळे, वडगाव तेजन, शारा आदी ठिकाणच्या ३ हजार १२ शेतकर्‍यांची ७१२ हेक्टर शेत जमीन खरडून गेलेली आहे. यामध्ये खरडून गेलेल्या परंतु दुरुस्त होणार्‍या ६६१ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणार्‍या ५२ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार होती. मात्र वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे. अतवृष्टीनंतर झालेली गारपीट आणि आता पुन्हा पेरणीच्या काळात पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजावर अस्मानी सोबत सुलतानी संकट ओढावले आहे. खरडून गेलेल्या क्षेत्राचा सर्वे होऊन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवूनही शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तात्काळ मदतीचे वाटप करण्याची मागणी पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर चिभडे यांनी केली आहे. तालुका कृषी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकसान भरपाईची खात्री दिली. अतवृष्टीमुळे खरडून गेलेल्या ७१२ हेक्टर क्षेत्रापैकी ६६0 हेक्टर दुरुस्त होणारे असून यासाठी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणारे ५२ हेक्टर साठी २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसानीचा संपूर्ण अहवाल सर्वेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला असून शासन स्तरावरुन निधी प्राप्त होताच शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.