शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:07 IST

धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून चार महिने लोटले असताना सुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे ...

धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून चार महिने लोटले असताना सुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीची सुद्धा मदत पीक विमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावर सुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळेे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धामणगाव बढेे परिसरासह मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे यावेळी सोयाबीन,मका,कपाशी पिकाचेे मोठे नुकसान झालेे आहे. अडचणीत असताना सुद्धा हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पीक विमा काढला. पीक विमा काढण्यासाठी अधिकृत असलेल्या कंपनीने मोठी जाहिरातबाजी करत शेतकऱ्यांना विमा काढण्यास प्रवृत्त केले. यापूर्वी विविध कंपन्यांचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होता. तर मागील वर्षीपासून शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त केली. त्यामुळेे शेतकऱ्यांकडे पीक विमा काढण्यासाठी विविध कंपन्यांचा पर्याय राहिला नाही. पिकाचेेेे नुकसान, उत्पन्न यासाठी शासनामार्फत जुनीच पद्धत अवलंबिली जाते.तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहायक शेतकऱ्याच्या बांधावर कधी जातात हा संशोधनाचा विषय असून शेतकऱ्याचे भवितव्य मात्र यांच्या हातात असते.याबाबत मोताळा तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांना विचारणा केली असता पीक विमाबाबत खरीप हंगामाचे विविध पिकाबाबत महसूल उत्पन्न व त्याची मागील पाच वर्षांची सरासरी काढण्याची प्रक्रिया सुरू असून पीक विम्याच्या पात्रतेबाबत सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

बाेंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले

कपाशीच्या पहिल्याच वेचणीच्या वेळी झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव, अत्यल्प पावसामुळे सोयाबीन व मका पिकांचे घटलेले उत्पन्न, त्या वेळेस झालेला अवकाळी पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान पीक विम्यातून भरून निघेल अशी शेतकऱ्यांना अशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे. संबंधित पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असतो.

काेट

पीक विमा कंपन्या, सरकारमधील मंत्री व शासकीय अधिकारी यांचे असलेले साटेलोटे यामधून शेतकरी लुटला जात आहे. पीक विमा कंपन्यांनी वेळीच सुधारणे गरजेचे आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन तथा केंद्र शासनाने पीक विमा कंपन्यांनाा त्यांच्या हक्काची मदत देण्यासाठी बाध्य करावे. स्वाभिमानी शेतकरी संघटना पात्र शेतकऱ्यांची पई न पई वसूल केल्याशिवाय राहणार नाही.

रविकांत तुपकर,

शेतकरी स्वाभिमानी संघटना