शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

खरिपाच्या ताेंडावर शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

बुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर आला असून, बँकांच्या उदासीन धाेरणामुळे एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत केवळ ...

बुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर आला असून, बँकांच्या उदासीन धाेरणामुळे एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत केवळ २३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन पीककर्ज तातडीने वाटप करण्याचे आदेश बॅंकांना दिले हाेते. तरीही पीककर्ज वाटप संथ गतीने हाेत असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या नावाने दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाची जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे अजूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. पीककर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. कर्जमाफी झाली नसलेल्या शेतकऱ्यांनाही पुनर्गठन करून देण्यास बँक तयार नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ७७३ कोटी ७७ लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. दरवर्षीप्रमाणे बँकांची पीककर्ज वाटपासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, आता त्यांना पीककर्जाची अत्यंत आवश्यकता आहे. आतापर्यंत बँकांनी फक्त २९० काेटी ४४ लाखांपर्यंत पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टापैकी अत्यल्प कर्ज वितरण करण्यात आले आहे. हीच भूमिका बँकांची असली तर शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जावे लागेल. यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढल्याशिवाय राहाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पीककर्ज वितरणाकडे लक्ष केंद्रित करून बँकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर पीककर्ज वाटप करून घ्यावे, अशी मागणी हाेत आहे.

पुनर्गठणामुळे हाेतोय विलंब

अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. त्यामुळे, त्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे बॅंकांमध्ये जमा केलेले नाही. काही बॅंकांकडूनही शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याची गरज आहे.

३२ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज

यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना एक हजार ३०० काेटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ८ जूनपर्यंत बॅंकांनी केवळ ३२ हजार १७९ शेतकऱ्यांना २९० काेटी ४४ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. लक्ष्यांकापैकी केवळ २२ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. एक लाख सात हजार ८२१ शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा आहे.