शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त साखरखेर्डा : पावसाचा थेंब अथवा वाऱ्याची झुळूक जरी आली तरी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात येत ...

विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त

साखरखेर्डा : पावसाचा थेंब अथवा वाऱ्याची झुळूक जरी आली तरी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने साखरखेर्डा येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

अंढेरा : परिसरात नुकतीच जमिनीच्या वर आलेल्या कोवळ्या सोयाबीन व भेंडीच्या पिकावर राेहींच्या कळपाने ताव मारत पिके नष्ट केली. वन्यप्राणी असलेल्या रोहींच्या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व भेंडी प्लॉटचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

शेतीच्या वादातून दाेन गटात हाणामारी

माेताळा : तालुक्यातील दाभाडी शिवारात शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३० जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रसवंती जाळली, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा

किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या शेलगाव राऊत फाट्यावर असलेल्या रसवंती केंद्राची अज्ञात आरोपीने जाळपोळ केली आहे. ही घटना २९ जून रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काेराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग

मेहकर : एकाच रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प पाण्याने तुडुंब भरला असून त्यामुळे सांडव्यातून असा पाण्याचा विसर्ग होत आहे़ धरण १०० टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़

पाठ्यपुस्तक शिवाय शाळा सुरू

बुलडाणा : मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजना यावेळी निष्क्रिय ठरली असून पहिल्या घंटेलाच मिळणारी पुस्तके ऑनलाईनची शिकवणी सुरु झाल्यानंतरही मिळाले नाही. परिणामी शिक्षक कितीही शिकवत असो विद्यार्थ्यांना मात्र काय शिकवले हे कळेनासे झाले आहे.

शेतात जाण्यावरून दाेन गटात हाणामारी

माेताळा : शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २९ जून रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास मोहेगाव येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

चिखली : आमखेड परिसरात झालेल्या ढगसदृश्य पावसामुळे गाव तलाव फुटला हाेता़ त्यामुळे, शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़