शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेची बुलडाण्यात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:20 IST

Buldhana News रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेच्यावतीने बुलडाण्यात शुक्रवारी रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊस असून त्यानुषंगानेही या कायद्यात काही दुरुस्त्या करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकल्याबाबत आनंदही व्यक्त करण्यात आला.या रॅलीमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान कणखर, वामनराव जाधव, देविदास कणखर नामदेवरावजाधव, एकनाथ थुट्टे, विलास मुजमुळे, विठ्ठ्ठल थुट्टे, एकनाथ पºहाड, रणजित डोसे, आत्माराम गाडे, बाबुराव व लोढे, अशोक तायडे, रमेश शिंदे, अर्जून जाधव, सुरेश सोनुने यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकºयांना काही प्रमाणात व्यापाराचे स्वातंत्र्य दिले असले तरी आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळेल्या शेतमालचे दर पुन्हा ठरावीक पातळी पेक्षा जास्त वाढल्यास ती पिके पुन्हा आवश्यक वस्तू काद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतुद ही कायद्याशी विसंगत आहे. शेतीमाल व्यापारात अशी अनिश्चितता असल्यास शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता नाही. तसेच शेतकºयांच्या मालाला कधीच किफायतशीर दर मिळण्याची शक्यता कमी असले अशी धारणा शेतकºयांमध्ये होत आहे. त्यानुषंगानेही यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हे त्याचे उदाहरण असल्याचे कणखर यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र