शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बँकांच्या सलग सुटीमुळे शेतकरी अडचणीत!

By admin | Updated: June 27, 2017 09:26 IST

कर्जमाफीच्या घोषणेमुळे मंगळवारी उसळणार गर्दी!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकांना सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यापासून बँका बंदच आहेत. त्यामुळे कर्र्जमाफी मिळालेले शेतकरी बँका उघडण्याची वाट पाहत असून, मंगळवारी बँकांमध्ये एकच गर्दी उसळणार आहे.बहुप्रतीक्षित ठरलेली सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी जाहीर केली. यामध्ये शेतीची कोणतीही मर्यादा न ठेवता दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. यात जून २०१६ पर्यंतच्या थकीत कर्जाचा समावेश आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पेरणीचे दिवस आलेले असताना व अनेक शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नसल्याने त्यांची आधीच अडचण झालेली आहे. त्यात शनिवारी जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे अशा शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; मात्र ज्या दिवशी कर्जमाफी जाहीर झाली तो चवथा शनिवार असल्याने बँका या दिवशी बंदच होत्या. दुसऱ्या दिवशी रविवारची साप्ताहिक सुटी व सोमवारी रमजान ईदची सुटी असल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंदच राहिल्या. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्याने त्यांना नवीन कर्जाबाबत बँकेकडे विचारणा करण्यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे; मात्र बँकांची सलग सुटी आली. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली. आता मंगळवारी बँका उघडताच सर्व बँकांमध्ये गर्दी उसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा ताण चांगलाच वाढणार असून वादविवादाचे प्रसंगही उद्भवू शकतात. बँकांकडून पुन्हा टोलवाटोलवीची शक्यता!बँकांचे शेतकऱ्यांसोबत सहकार्याचे धोरण नसल्याचे नेहमीच दिसून येते. या अगोदर कर्जमाफीची घोषणा सरकारने करुन शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज पेरणीसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते; परंतु शासनाने परिपत्रक काढूनही बँका याबाबत आम्हाला आदेशच प्राप्त झाले नसल्याचे अजूनही सांगत आहेत. सदर १० हजाराचे तत्काळ कर्ज वाटप अद्यापही शेतकऱ्यांना सुरु झालेले नाही. सदर कर्ज वाटप रखडलेले असताना आता नवीन आदेशही आम्हाला प्राप्त नसल्याचे सांगून बँका टोलवाटोलवी करु शकतात.