शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

फळबागेत आंतर पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे आपल्या भागामध्ये कमी कालावधीत होणारे पिकाचे वाण घेवडा, वाल, उडीद, ...

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे आपल्या भागामध्ये कमी कालावधीत होणारे पिकाचे वाण घेवडा, वाल, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन यांचे फळबागेत आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. आंतर पिकाच्या वाढणाऱ्या मुळांमुळे पाण्याचा निचरादेखील चांगल्या पद्धतीने होऊन जमीन लवकर वापशावर येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिके भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन, वाल याचा समावेश शेतकरी करीत आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि याचा अनुकूल परिणाम होतो. या उद्देशाने परिसरातील एका शेतकऱ्याने शेतातील फळबागेत वाल हे आंतर पीक म्हणून लागवड केली आहे. यासाठी अगोदर फळबागेत झाडांच्या बाजूने चहूबाजूने दीड फूट जागा सुटेल अशा पद्धतीने रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्यामध्ये लाईन पद्धतीचा अवलंब करून ठिबक आच्छादन करून घेतले. ठिबकद्वारे पाणी सोडून जमीन ओली करून घेतली व आंतर पीक म्हणून वाल लागवड केली.

यामुळे शेतकऱ्याला आंतर पीक फायदेशीर ठरेल.

आंतर पिकाने जमिनीची धूप कमी होते.

सरासरीपेक्षा पाऊसमान कमी झाल्यास कमी कालावधीत येणारी आंतर पिके निश्चित फायदा देतात. सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास धूपरोधक आंतर पिके जमिनीची धूप कमी करतात. यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो. सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त कोणत्याही प्रकारचा पाऊस असला तरी आंतर पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास हमखास उत्पादन येण्यास हमी असते. जमिनीचे क्षेत्रफळ कमी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असे अंतर्गत पीक घेत आहेत.