शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

By admin | Updated: July 14, 2015 02:08 IST

एक दशकात बुलडाणा जिल्ह्यात १५९७ आत्महत्या.

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : पावसाअभावी शेती नापीक झाली, म्हणून कर्ज काढून पुन्हा पेरणी केली; मात्र पावसाने दगा दिला. पुन्हा बँकेचे कर्ज काढले, असा हा कर्जाचा डोंगर शेतकर्‍याच्या डोक्यावर वाढत गेला आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. या फेर्‍यातून जे सावरले नाही, त्यातील काहींनी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले तर काहींनी गळफास लावून भरल्या संसारावर पाणी सोडले. अशा बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडुन जी मदत मिळावयास पाहिजे होती तिलाही प्रशासनाने निकषांचा ह्यफासह्ण लावला आहे. मागील १0 वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील १५९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आत्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६३५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९१४ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे पात्रपेक्षा अपात्रतेचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळु शकला नाही. बुलडाणा जिल्ह्यात सन २00१ ते १२ जुलै २0१५ पर्यंत नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १५९७ शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शासन दप्तरी नोंद आहे. या आत्महत्येतील शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ६३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली असली ९१४ आत्महत्यांमध्ये निकषाचाच फास आडवा आला आहे. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पाऊस जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान केले. तर खरिपाच्या हंगामात जून महिना पुर्णत: कोरडा गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.