शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

By admin | Updated: July 14, 2015 02:08 IST

एक दशकात बुलडाणा जिल्ह्यात १५९७ आत्महत्या.

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : पावसाअभावी शेती नापीक झाली, म्हणून कर्ज काढून पुन्हा पेरणी केली; मात्र पावसाने दगा दिला. पुन्हा बँकेचे कर्ज काढले, असा हा कर्जाचा डोंगर शेतकर्‍याच्या डोक्यावर वाढत गेला आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. या फेर्‍यातून जे सावरले नाही, त्यातील काहींनी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले तर काहींनी गळफास लावून भरल्या संसारावर पाणी सोडले. अशा बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडुन जी मदत मिळावयास पाहिजे होती तिलाही प्रशासनाने निकषांचा ह्यफासह्ण लावला आहे. मागील १0 वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील १५९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आत्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६३५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९१४ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे पात्रपेक्षा अपात्रतेचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळु शकला नाही. बुलडाणा जिल्ह्यात सन २00१ ते १२ जुलै २0१५ पर्यंत नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १५९७ शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शासन दप्तरी नोंद आहे. या आत्महत्येतील शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ६३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली असली ९१४ आत्महत्यांमध्ये निकषाचाच फास आडवा आला आहे. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पाऊस जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान केले. तर खरिपाच्या हंगामात जून महिना पुर्णत: कोरडा गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.