शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

आंबोडा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2016 02:58 IST

सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या.

आकोट: नजीकच्या आंबोडा येथील रामकृष्ण नारायण अस्वार (५0) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीला कंटाळून ३0 मे रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामकृष्ण नारायण अस्वार यांच्याकडे ५१ आर शेतजमीन असून, त्यात त्यांनी सन २0१५ व २0१६ मध्ये केळीच्या पिकाची लागवड केली; परंतु दोन्ही वर्षे सतत अल्पवृष्टीमुळे त्यांना नापिकी झाली. अस्वार यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचे ४८ हजार रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. अशा स्थितीतच त्यांच्या मुलीचा विवाह ३0 एप्रिल रोजी झाला. सततची नापिकी, बँकेचे थकीत कर्ज व त्यातच मुलीच्या विवाहाचा ताण या सार्‍या बाबींना कंटाळून त्यांनी अरुण रेचे यांच्या शेता तील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत विनोद जगन्नाथ अस्वार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गावंडे, पोलीस नायक महेश श्रीवास हे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे ३0 मे २0१५ रोजी अपघातात निधन झाले होते. नेमक्या त्याच दिवशी त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.