शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज तुटवड्याचा फटका शेतकर्‍यांना

By admin | Updated: May 13, 2017 18:45 IST

दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्यासुमारास सुरू करण्यात येत आहे.

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे वीजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरणने कृषि पंपांना देण्यात येणाऱ्या वीजेत कपात केली असून, दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे.

 दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळींब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पिकही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पिक घेतल्या जाते.उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या  वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषिपंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर विद्युत पुरवठा बंद असतो तर रात्रीच्यावेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणला महानिर्मितीसह विविध स्त्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मे.वॅ.पर्यन्त विजेची उपलब्धता कमी असतांनाही महावितरणने १५०० मे.वॅ. पर्यन्त  आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिककारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.  यासोबतच इतर स्त्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.