शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वीज तुटवड्याचा फटका शेतकर्‍यांना

By admin | Updated: May 13, 2017 18:45 IST

दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्यासुमारास सुरू करण्यात येत आहे.

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे वीजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरणने कृषि पंपांना देण्यात येणाऱ्या वीजेत कपात केली असून, दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे.

 दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळींब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पिकही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पिक घेतल्या जाते.उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या  वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषिपंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर विद्युत पुरवठा बंद असतो तर रात्रीच्यावेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणला महानिर्मितीसह विविध स्त्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मे.वॅ.पर्यन्त विजेची उपलब्धता कमी असतांनाही महावितरणने १५०० मे.वॅ. पर्यन्त  आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिककारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.  यासोबतच इतर स्त्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.