शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:31 IST

लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे घेतलेले कर्ज ‘जैसे थे’ शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले!

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.परिसरातील शेतकर्‍यांवर गेल्या चार-पाच वर्षापासून आस्मानी, सुलतानी, नैसर्गिक आपत्तीने पीक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती खालावली आहे. त्यातच शासनाच्या वेळकाढून पणामुळे निघालेल्या कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाले आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शासनाने कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असणार्‍या शेतकर्‍याची दिवाळी मात्र अंधारातच गेली. दिवाळीनंतर महिना होत आला तरी अद्यापही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यंदा खरीप, रब्बी हंगामी पिकांचे बि-बियाणे, खत, औषधी, पेरणी पिक काढणी व शेती मशागतीची मजुरी या सर्वांचे भाव वाढले आहे. तर दुसरीकडे शेती मालाला भाव नाही, नेहमी शेतमालाची बाजारात आवक वाढली की, शेतमालाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडते. मात्र याकडे शासनासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी कायम आर्थिक विवंचनेत असतो. परिणामत: त्याचा आर्थिकस्तर उंचावत नसल्याचे सुज्ञ नागरिक बोलून दाखवित आहेत. 

सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्याची चिंतासोयाबीनच्या नगदी पिकाच्या भरवशावर बरेच शेतकरी खाजगी सावकाराकडून कर्ज स्वरुपात पैसे घेऊन पिकांचा लागवड व मशागत खर्च भागवत असतात. मात्र यावर्षीच्या सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे बि-बियाणे व लागवड खर्चही भागत नसल्याने सावकाराचे देणे कसे द्यायचे ह्या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

टॅग्स :agricultureशेती