शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

शेतक-यांचा संप सुरूच!

By admin | Updated: June 4, 2017 05:21 IST

शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिस-या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा/ खामगाव : शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिसऱ्या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पूर्ण करेपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला. े जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णत्वास जात नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणार असून, यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खामगावात सर्वपक्षीयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची दुर्दैवी वेळ कृषिप्रधान असलेल्या देशात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आली आहे; मात्र शेतकऱ्यांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी पुन्हा अर्धवट आश्वासने शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जात आहेत; मात्र आता हीच योग्य वेळ असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डच्या सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर देशमुख, भाराकाँचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.अनिल अंमलकार, शहरप्रमुख सुनील अग्रवाल, माजी शहरप्रमुख संजय अवताडे, अ.भा.किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पताळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंजाजी टिकार, विदर्भ विकास आवामी पार्टीचे डॉ.नावेद देशमुख यांच्या उपरोक्त सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ४५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर संपासारखी दुर्दैवी वेळ आली असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या ५ जून रोजी खामगाव बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवून अधिक तीव्र करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला.जानेफळ येथे आठवडी बाजार बंदला प्रतिसाद शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपाला समर्थन म्हणून येथील आठवडी बाजार ३ जून रोजी बंद ठेवण्यात आला असून, शेतकऱ्यांचा या बंदला प्रतिसाद मिळाला. कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारलेला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून जानेफळ येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून ३ जून रोजी दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, २ जून रोजी दवंडी देऊन जानेफळ व परिसरात सूचित करण्यात आले होते. तसेच भाजीपाला अडत व्यापारी इत्यादींना मोबाइलवरून संपर्क करून शनिवारचा बाजार बंद असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे कुठलाच भाजीपाला अडत दुकान तसेच इतर व्यापारीवर्गसुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारात आपली दुकाने घेऊन आले नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता; परंतु दुपारनंतर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केल्यामुळे भाजीपाला व इतर घरगुती आवश्यक वस्तुंची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री झाली. जानेफळ येथे प्रथमच शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याचा हा प्रकार घडला आहे. परिसरातील जवळपास ५२ खेड्यातील जनता येथील आठवडी बाजारात येत असते; मात्र आजच्या बाजार बंदमुळे जनतेला फारच महागड्या वस्तू खरेदी करणे भाग पडले आहे. शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ, पांडुरंग चांगाडे, गणेश पाखरे, रामेश्वर लाहोटी, अशोक नवले, दिनकर पाटील, रमेश मिश्रा आदींनी या आठवडी बाजार बंदचे आवाहन केले होते. (वार्ताहर)