शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा संप सुरूच!

By admin | Updated: June 4, 2017 05:21 IST

शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिस-या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा/ खामगाव : शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिसऱ्या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पूर्ण करेपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला. े जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णत्वास जात नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणार असून, यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खामगावात सर्वपक्षीयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची दुर्दैवी वेळ कृषिप्रधान असलेल्या देशात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आली आहे; मात्र शेतकऱ्यांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी पुन्हा अर्धवट आश्वासने शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जात आहेत; मात्र आता हीच योग्य वेळ असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डच्या सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर देशमुख, भाराकाँचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.अनिल अंमलकार, शहरप्रमुख सुनील अग्रवाल, माजी शहरप्रमुख संजय अवताडे, अ.भा.किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पताळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंजाजी टिकार, विदर्भ विकास आवामी पार्टीचे डॉ.नावेद देशमुख यांच्या उपरोक्त सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ४५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर संपासारखी दुर्दैवी वेळ आली असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या ५ जून रोजी खामगाव बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवून अधिक तीव्र करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला.जानेफळ येथे आठवडी बाजार बंदला प्रतिसाद शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपाला समर्थन म्हणून येथील आठवडी बाजार ३ जून रोजी बंद ठेवण्यात आला असून, शेतकऱ्यांचा या बंदला प्रतिसाद मिळाला. कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारलेला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून जानेफळ येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून ३ जून रोजी दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, २ जून रोजी दवंडी देऊन जानेफळ व परिसरात सूचित करण्यात आले होते. तसेच भाजीपाला अडत व्यापारी इत्यादींना मोबाइलवरून संपर्क करून शनिवारचा बाजार बंद असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे कुठलाच भाजीपाला अडत दुकान तसेच इतर व्यापारीवर्गसुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारात आपली दुकाने घेऊन आले नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता; परंतु दुपारनंतर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केल्यामुळे भाजीपाला व इतर घरगुती आवश्यक वस्तुंची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री झाली. जानेफळ येथे प्रथमच शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याचा हा प्रकार घडला आहे. परिसरातील जवळपास ५२ खेड्यातील जनता येथील आठवडी बाजारात येत असते; मात्र आजच्या बाजार बंदमुळे जनतेला फारच महागड्या वस्तू खरेदी करणे भाग पडले आहे. शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ, पांडुरंग चांगाडे, गणेश पाखरे, रामेश्वर लाहोटी, अशोक नवले, दिनकर पाटील, रमेश मिश्रा आदींनी या आठवडी बाजार बंदचे आवाहन केले होते. (वार्ताहर)