शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण भिंतीसाठी शेतकऱ्यांचे रस्ते केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

मेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट ...

मेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंती बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घरी कसा न्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, तसेच रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या बाेगद्याची उंची कमी असल्याने, त्यामधून वाहने तर दूर साधे माणसेही जाऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व त्यांचा शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेतरस्त्यांची तरतूद केलेली आहे. असे असतानाही कंपनीमार्फत मात्र सदर शेतरस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने सदर काम हे आंध्रुड येथे सुरू होतातच बंद पाडण्यात आले आहे. याबाबत शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. त्यांना वस्तुस्थितीची जाणीवही करून देण्यात आली आहे. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अद्यापही रस्त्याच्या बाबतीत हा प्रश्‍न सोडविला नाही. भविष्यात शेतरस्ता सोडला नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसणार आहे. यासोबतच शेतातील नैसर्गिक पद्धतीने वाहणारे पाणी यालाही अडसर निर्माण होऊन हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतात वाहने नेण्यासाठी कसरत

काही ठिकाणी समृद्धी महामार्गाला रस्ता ओलांडण्यासाठी बोगदे ठेवण्यात आले आहेत. मात्र, सदर बोगद्याची उंची कमी ठेवण्यात आली असल्यामुळे शेतीतील वाहने, जसे की ट्रॅक्टर ट्रॉली, हार्वेस्टर यांसारखी उंची असलेली वाहने या बोगद्यामधून जात नाहीत. या शिवाय सदर बोगदे हे शेतजमिनीपेक्षा खोल असल्यामुळे पावसाळ्यात या बोगद्याद्वारे पाणी वाहून जाण्यासाठी, त्याचप्रमाणे पाणी थांबण्यासाठी याचा वापर होईल. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गावरस्तेही झाले बंद

खंडाळा ते पिंर्प्री माळी, अंजनी बुद्रुक ते उमरा, आंध्रुड ते डोणगाव ही गावे एकमेकांना शेत रस्त्यांच्या माध्यमातून जोडला जात होती. मात्र, सदर रस्ता समृद्धी महामार्गाने बंद केला असून, या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

समृद्धी महामार्ग प्रोजेक्टमध्ये तरतूद असलेला शेतरस्ता सोडून सदर कंपनीने संरक्षण भिंतीचे काम करावे, अन्यथा हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही, तोपर्यंत आम्ही संरक्षण भिंतींचे काम बंद पाडू.

- प्रदीप देशमुख ,अध्यक्ष, समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समिती, मेहकर