शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
3
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
4
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
5
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
6
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
7
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
8
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
9
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
10
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
11
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
12
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
13
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
14
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
15
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
16
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
17
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
18
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
19
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
20
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...

संरक्षण भिंतीसाठी शेतकऱ्यांचे रस्ते केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

मेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट ...

मेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंती बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घरी कसा न्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, तसेच रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या बाेगद्याची उंची कमी असल्याने, त्यामधून वाहने तर दूर साधे माणसेही जाऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व त्यांचा शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेतरस्त्यांची तरतूद केलेली आहे. असे असतानाही कंपनीमार्फत मात्र सदर शेतरस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने सदर काम हे आंध्रुड येथे सुरू होतातच बंद पाडण्यात आले आहे. याबाबत शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. त्यांना वस्तुस्थितीची जाणीवही करून देण्यात आली आहे. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अद्यापही रस्त्याच्या बाबतीत हा प्रश्‍न सोडविला नाही. भविष्यात शेतरस्ता सोडला नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसणार आहे. यासोबतच शेतातील नैसर्गिक पद्धतीने वाहणारे पाणी यालाही अडसर निर्माण होऊन हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतात वाहने नेण्यासाठी कसरत

काही ठिकाणी समृद्धी महामार्गाला रस्ता ओलांडण्यासाठी बोगदे ठेवण्यात आले आहेत. मात्र, सदर बोगद्याची उंची कमी ठेवण्यात आली असल्यामुळे शेतीतील वाहने, जसे की ट्रॅक्टर ट्रॉली, हार्वेस्टर यांसारखी उंची असलेली वाहने या बोगद्यामधून जात नाहीत. या शिवाय सदर बोगदे हे शेतजमिनीपेक्षा खोल असल्यामुळे पावसाळ्यात या बोगद्याद्वारे पाणी वाहून जाण्यासाठी, त्याचप्रमाणे पाणी थांबण्यासाठी याचा वापर होईल. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गावरस्तेही झाले बंद

खंडाळा ते पिंर्प्री माळी, अंजनी बुद्रुक ते उमरा, आंध्रुड ते डोणगाव ही गावे एकमेकांना शेत रस्त्यांच्या माध्यमातून जोडला जात होती. मात्र, सदर रस्ता समृद्धी महामार्गाने बंद केला असून, या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

समृद्धी महामार्ग प्रोजेक्टमध्ये तरतूद असलेला शेतरस्ता सोडून सदर कंपनीने संरक्षण भिंतीचे काम करावे, अन्यथा हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही, तोपर्यंत आम्ही संरक्षण भिंतींचे काम बंद पाडू.

- प्रदीप देशमुख ,अध्यक्ष, समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समिती, मेहकर