शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

जमिनीचे संमतीपत्र देण्यास शेतक-यांचा नकार!

By admin | Updated: March 25, 2017 02:35 IST

नवनगरं रद्द झाल्यास संघर्ष समितीच्यावतीने स्वागतच!

बुलडाणा, दि. २४- मुंबई - नागपूर या समृद्धी मार्गावर नवनगरांसाठी ४00 हेक्टर क्षेत्रापर्यंत जमिनीसाठी शेतकर्‍यांचे संमतीपत्र मिळाले नाही, तर तेथील नवनगरं रद्द होऊ शकतात. यासंदर्भात ह्य..तर दोन नवनगरं होणार रद्दह्ण या मथळ्याखाली ह्यलोकमतह्णने २४ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले असता, या वृत्ताची दखल बुलडाणा जिल्हा महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आली असून, नवनगरांसाठी संमतीपत्र न देण्यावर शेतकरी ठाम असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई - नागपूर या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात बुलडाणा जिल्ह्यात तीन नवनगरं होणार होते; परंतु नवनगरांकरिता लागणार्‍या जमिनीसाठी शेतकर्‍यांना सक्ती केली जाणार नाही. तसेच किमान ४00 हेक्टरपर्यंत जमिनीचे संमतीपत्र मिळाल्यासच त्याठिकाणी नवनगर होऊ शकते. मुंबई-नागपूर या समृद्धी मार्गावर बुलडाणा जिल्ह्यात माळसावरगाव येथे नवनगर प्रस्तावित असून, मलकापूर पांग्रा व साब्रा याठिकाणी ४00 हेक्टर क्षेत्रापर्यंत जमिनीसाठी शेतकर्‍यांचे संमतीपत्र मिळाले नाही, तर सदर नवनगरं रद्द होऊ शकतात. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने ह्य..तर दोन नवनगरं होणार रद्दह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले असता, या वृत्ताची दखल बुलडाणा जिल्हा समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आली आहे. सदर वृत्त प्रकाशित करताच दोन नवनगरं रद्द झाल्यास, या निर्णयाचे स्वागतच आहे. शेतकर्‍यांची संमती न मिळाल्यास नवनगरं रद्द होत असेल, तर जिल्ह्यातील ८00 हेक्टर जमीन वाचू शकते. त्यामुळे नवनगराच्या जमिनीकरिता शेतकरी संमतीपत्र देणार नसल्याचा इशारा बुलडाणा जिल्हा महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. २0 वर्षांंपूर्वी मेहकर व सिंदखेड राजा येथे तुटपुंज्या दरात हजारो एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्या जमिनीवर कुठलाच उद्योग उभारण्यात आला नाही. आता पुन्हा समृद्धी मार्गावरील नवनगरांसाठी जमिनी घेण्यात येत आहेत. त्याचीही परिस्थिती याउलट दिसून येत नाही. औद्योगिक विकासाच्या नावाखाली घेतलेल्या जमिनी सध्या पडून आहेत. नवनगरांसाठी प्रस्तावित असलेल्या ठिकाणी औद्योगिक विकासासाठी कुठल्याच सुविधा नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे नवनगराचा विकास कसा होणार ? असा प्रश्न संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. २0१३ च्या भूसंपादन कायद्याने जमिनी घेण्यासाठी सदर कायद्यातील प्रत्येक कलमाची अंमलबजावणी करून त्याचा सदर शेतकर्‍यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीचे प्रदीप देशमुख, नितीन देशमुख, अनंतराव खोकळे, नारायणराव देशमुख, रितेश वानखेडे, पी.आर. देशमुख, संजय अजबे, दिलीप कोल्हे, विठ्ठल देशमुख, शिवाजी म्हस्के, संजय काळे यांनी केली आहे. नवनगरं रद्द झाले, तर शेतकर्‍यांची जमीन वाचू शकते. त्यामुळे नवनगरांसाठी शेतकरी संमती पत्र देणार नाहीत. तसेच महामार्गात जाणार्‍या जमिनीचा २0१३ च्या भूसंपादन कायद्याने शेतकर्‍यांना लाभ देण्यात यावा. या कायद्यातील प्रत्येक कलमाचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा.- प्रदीप देशमुख,सचिव, महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समिती, बुलडाणा.