शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शेतकरी करणार परदेशी पिकांचा अभ्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:13 IST

बुलडाणा : उत्पादित होणार्‍या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा  करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात अवलंब करणे  गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे परदेशी पिकांचा अभ्यास  करण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८८ शेतकरी परदेश दौर्‍यासाठी उत्सुक दोन अर्ज अपात्र 

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उत्पादित होणार्‍या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा  करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात अवलंब करणे  गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे परदेशी पिकांचा अभ्यास  करण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना संधी देण्यात आली आहे.  त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांचे जिल्हा स्तरावर प्रस्ताव  मागविण्यात आले होते. विविध देशांनी विकसित केलेले शे तीविषयक तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेण्यासाठी  जिल्ह्यातील ८८ शेतकर्‍यांनी  उत्सुकता दर्शवली असून, यामध्ये  दोन शेतकर्‍यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. शेतीच्या समृद्धीसाठी शेतकर्‍यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती  उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. देशातीत नागरिक शेती व  शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतकर्‍यांनी आ पल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे, शेतीच्या  समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पारंपरिक पद्ध तीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून  शेतकर्‍याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत् पादनात निश्‍चित वाढ होते. देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात  उतरत आहे. त्यामुळे शेती व्यवसायात होत असलेल्या नवनवीन  बदलांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.   यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन  कामाची गुणवत्ता सुधारते. यासाठी शेतकर्‍यांना विविध देशांतील  तंत्रज्ञान कळावे, या उद्देशाने शेतकर्‍यांसाठी देशाबाहेरील  अभ्यास दौरा होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने सन २0१७- १८ या वर्षासाठी इस्रायल, र्जमनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया  याप्रमाणे अभ्यास दौर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या  दौर्‍यात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना खर्चाच्या ५0 टक्के किंवा  जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल, ते  अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या दौर्‍याचा लाभ  घेणार्‍या शेतकर्‍यांकडे पासपोर्ट, विमा पॉलिसी, स्वत:चे नाव  असलेला सात-बारा आणि नमुना आठ अ असणे आवश्यक  आहे. त्यासाठी इच्छुक शेतकर्‍यांचे प्रस्ताव तालुका कृषी  अधिकार्‍यांकडे मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील  ८८ शेतकर्‍यांनी परदेश दौर्‍यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.  यामध्ये दोन शेतकर्‍यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. शेतकर्‍यांना  परदेश दौर्‍याची ही संधी उत्पादित होणार्‍या शेतमालाचा दर्जा  सुधारण्यासाठी चांगली फायद्याची ठरणार आहे. 

परदेश दौर्‍यासाठी आज होणार लॉटरी! शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता, शेतीमालाचा  दर्जा, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादनाचे ग्रेडिंग, प्रतवारी,  साठवणूक, पॅकेजिंग व ब्रँड विकसित करून शेतीमालाचे  यशस्वी विपणन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी शे तकर्‍यांना जगातील उत्कृष्ट नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी,  यादृष्टीने राज्यातील शेतकर्‍यांचे शासनाच्या कृषी विभागामार्फत  परदेशात अभ्यास दौरा काढण्यात येणार असून, त्याकरिता  जिल्ह्यातून ८८ शेतकर्‍यांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे आले  आहेत. सदर प्रस्तावांना क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी १६ ऑ क्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र धाड रोड  बुलडाणा येथे लॉटरी काढण्यात येणार आहे.

व्यावसायिक असल्यास अर्ज ठरणार अपात्रपरदेश दौर्‍यासाठी कृषी विभागाकडून विविध नियम व अटी  ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रस्ताव सादर करणार्‍या शे तकर्‍यांचा वयोगट २५ ते ६0 वर्षे ठेवण्यात आलेला आहे.  त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे शेती असावे. तसेच शासकीय,  निमशासकीय, सहकारी संस्थेत नोकरीस, वैद्यकीय क्षेत्रातील  डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक  असल्यास सदर अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.  

टॅग्स :agricultureशेती