शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

स्वाभिमानीच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी कृषी आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी हितासाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू ...

स्वाभिमानीच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी कृषी आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी हितासाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्राम, तालुका व जिल्हानिहाय समित्या स्थापन करून जिल्हाधिकारी अध्यक्ष तर उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या योजनेसाठी लाभार्थी निवड व माहिती संकलन व फीडिंग करणे ही जबाबदारी तहसील विभागाची होती. असे असताना काहींना योजनेचा लाभ मिळाला, तर असंख्य शेतकरी आजही योजनेपासून वंचित आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कृषी विभागास या योजनेत उत्कृष्ट कामकाज केल्याने पुरस्कार देण्यात आला असल्याने, तेव्हापासून कृषी व महसूल विभाग असा हा वाद पेटला आहे. यामुळेच या योजनेत व कार्य पद्धतीत कसलेही बदल करू नये, असे आदेशही १ एप्रिल रोजी कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र, तरीही तहसील विभागाकडून शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे, तर कृषी विभाग मात्र आमचा आणि योजनेचा संबंध नसल्याचे सांगत असल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी, कृषी आयुक्तांच्या आदेशास न जुमानल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना सन्मान योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या माहिती संकलन व फीडिंग करणाऱ्यांची चौकशी करून, दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, योजनेपासून वंचित असलेल्यांचा समावेश योजनेत करण्यात यावा, योजनेचे हप्ते प्राप्त न झालेल्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करावी आदी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानीच्या वतीने सादर करण्यात आले असून, आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विनायक सरनाईक, विदर्भाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, विकास देशमुख यांच्यासह प्रमुख शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वेठीस धरू नका : तुपकर

पुरस्कारामुळे कृषी व महसूल विभाग यांच्यामध्ये वाद सुरू आहे. तहसील विभागाकडून सन्मान योजनेच्या कामावर बहिष्कार असल्याचे सांगितले जात असल्याने यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. योजनेचे हप्तेही अनेकांना मिळाले नसल्याने सन्मान योजनेत शेतकऱ्यांचा होणारा अपमान सहन केला जाणार नाही, असे सुनावत तुपकरांनी कृषी आयुक्तासमोर संताप व्यक्त केला. दरम्यान, यावर तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.