शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

जिल्हाधिका-यांना निवेदन: आधारभूत किमतीने खरेदी करण्याची मागणी

बुलडाणा, दि. १४- यंदा तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात यावी, शेतकर्‍यांना तत्काळ पैसे मिळण्याची सोय करण्यात यावी तसेच तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीची होळी करून शासनाचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरीची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्राची संख्या अतिशय कमी आहे. बारदानाअभावी अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे. चुकार्‍यांपोटी शेतकर्‍यांना देण्यात आलेले चेक महिना महिना वटत नाहीत. त्यामुळे कास्तकाराला व्यापारी देईल त्या भावात तूर विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबावी, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तूर उत्पादक पट्टय़ात सर्व बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करून पुरेशे वजनकाटे लावावेत, खरेदी केंद्रावर २४ तासात तुरीचे वजन करण्याची व ४८ तासात चेक वटवून शेतकर्‍यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नमूद करून सरसकट कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने तुरीची होळी केली, यावेळी नामदेवराव जाधव, डॉ.हासनराव देशमुख, समाधान कणखर, मो.सादिक देशमुख, सुगदेव नरोटे, तेजराव मुंढे, दिनकर टेकाळे, जगदीश जैस्वाल, शेषराव शेळके, भागवत शेळके, सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शेळके, भिका सोळंकी, दिगंबर अंभोरे, उत्तम झुंबड, संतोष उबरहंडे, अर्जुन जाधव, माधव शिंदे, हरिदास खान्देभराड, दामोधर शर्मा, वैजयकुमार डागा, डॉ.बाबूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.