शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

जिल्हाधिका-यांना निवेदन: आधारभूत किमतीने खरेदी करण्याची मागणी

बुलडाणा, दि. १४- यंदा तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात यावी, शेतकर्‍यांना तत्काळ पैसे मिळण्याची सोय करण्यात यावी तसेच तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीची होळी करून शासनाचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरीची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्राची संख्या अतिशय कमी आहे. बारदानाअभावी अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे. चुकार्‍यांपोटी शेतकर्‍यांना देण्यात आलेले चेक महिना महिना वटत नाहीत. त्यामुळे कास्तकाराला व्यापारी देईल त्या भावात तूर विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबावी, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तूर उत्पादक पट्टय़ात सर्व बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करून पुरेशे वजनकाटे लावावेत, खरेदी केंद्रावर २४ तासात तुरीचे वजन करण्याची व ४८ तासात चेक वटवून शेतकर्‍यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नमूद करून सरसकट कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने तुरीची होळी केली, यावेळी नामदेवराव जाधव, डॉ.हासनराव देशमुख, समाधान कणखर, मो.सादिक देशमुख, सुगदेव नरोटे, तेजराव मुंढे, दिनकर टेकाळे, जगदीश जैस्वाल, शेषराव शेळके, भागवत शेळके, सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शेळके, भिका सोळंकी, दिगंबर अंभोरे, उत्तम झुंबड, संतोष उबरहंडे, अर्जुन जाधव, माधव शिंदे, हरिदास खान्देभराड, दामोधर शर्मा, वैजयकुमार डागा, डॉ.बाबूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.