शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

जिल्हाधिका-यांना निवेदन: आधारभूत किमतीने खरेदी करण्याची मागणी

बुलडाणा, दि. १४- यंदा तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात यावी, शेतकर्‍यांना तत्काळ पैसे मिळण्याची सोय करण्यात यावी तसेच तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीची होळी करून शासनाचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरीची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्राची संख्या अतिशय कमी आहे. बारदानाअभावी अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे. चुकार्‍यांपोटी शेतकर्‍यांना देण्यात आलेले चेक महिना महिना वटत नाहीत. त्यामुळे कास्तकाराला व्यापारी देईल त्या भावात तूर विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबावी, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तूर उत्पादक पट्टय़ात सर्व बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करून पुरेशे वजनकाटे लावावेत, खरेदी केंद्रावर २४ तासात तुरीचे वजन करण्याची व ४८ तासात चेक वटवून शेतकर्‍यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नमूद करून सरसकट कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने तुरीची होळी केली, यावेळी नामदेवराव जाधव, डॉ.हासनराव देशमुख, समाधान कणखर, मो.सादिक देशमुख, सुगदेव नरोटे, तेजराव मुंढे, दिनकर टेकाळे, जगदीश जैस्वाल, शेषराव शेळके, भागवत शेळके, सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शेळके, भिका सोळंकी, दिगंबर अंभोरे, उत्तम झुंबड, संतोष उबरहंडे, अर्जुन जाधव, माधव शिंदे, हरिदास खान्देभराड, दामोधर शर्मा, वैजयकुमार डागा, डॉ.बाबूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.