शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेतक-यांना आता वन्य प्राण्यांचा त्रास

By admin | Updated: July 9, 2017 09:41 IST

खामगाव परिसरात कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या चांगल्या साधलेल्या असून, पिके सुस्थितीत आहेत. मात्र, या कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे. नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळी पाने हे प्राणी फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी लगेच शेत मशागतीची कामे उरकून घेत पेरणीही आटोपून घेतली. यानंतर मात्र पावसाने काही भागात हुलकावणी दिली, तर काही भागात पुनरागमन केले. त्यामुळे काही भागातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ज्या भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली त्या भागातील पेरण्या चांगल्या साधल्या आहेत. परिणामी या भागात कोवळी पिके वार्‍यावर डुलताना दिसत आहेत. परंतु या पिकांवर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळ्या पिकांची हिरवीगार पाने हरीण, माकडे फस्त करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना दिवसभर शेतात थांबून रखवाली करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दिवसभर पिकाची राखण करुनही रात्रीच्यावेळी वन्य प्राणी येऊन पिकांचे नुकसान करतातच. विशेषत: रानडुकरे रात्री शेतांमध्ये घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.