शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना आता वन्य प्राण्यांचा त्रास

By admin | Updated: July 9, 2017 09:41 IST

खामगाव परिसरात कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या चांगल्या साधलेल्या असून, पिके सुस्थितीत आहेत. मात्र, या कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे. नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळी पाने हे प्राणी फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी लगेच शेत मशागतीची कामे उरकून घेत पेरणीही आटोपून घेतली. यानंतर मात्र पावसाने काही भागात हुलकावणी दिली, तर काही भागात पुनरागमन केले. त्यामुळे काही भागातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ज्या भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली त्या भागातील पेरण्या चांगल्या साधल्या आहेत. परिणामी या भागात कोवळी पिके वार्‍यावर डुलताना दिसत आहेत. परंतु या पिकांवर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळ्या पिकांची हिरवीगार पाने हरीण, माकडे फस्त करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना दिवसभर शेतात थांबून रखवाली करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दिवसभर पिकाची राखण करुनही रात्रीच्यावेळी वन्य प्राणी येऊन पिकांचे नुकसान करतातच. विशेषत: रानडुकरे रात्री शेतांमध्ये घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.